लोकसत्ता प्रतिनिधी

उरण : येथील द्रोणागिरी नोडला जोडणाऱ्या बोकडविरा व शेवा या गावांना जोडणाऱ्या उड्डाणपुलावरील वीजेचे दिवे मंगळवारी दुपारी दिवसाही सुरू होते. याच पुलावर अनेकदा वारंवार ये जा करणारी वीज आणि अंधार याचा सामना या पुलावरून चारचाकी व दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना याचा त्रास सहन करीत प्रवास करावा लागत आहे. तर पुलावरील खड्डे व विजेच्या लपंडावामुळे अपघातांची ही शक्यता वाढली आहे. त्यामुळे उड्डाणपुलावरील खड्डे दुरुस्त करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

आणखी वाचा-अवैधरित्या भारतात प्रवेश करून राहत होते दाम्पत्य, दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उरण मध्ये विकसित होत असलेल्या द्रोणागिरी नोडला जोडणारे रेल्वे उड्डाणपूल सिडकोकडून उभारण्यात आले आहेत. या पुलाची दुरुस्ती व देखभालीची जबाबदारी सिडकोची आहे. मात्र याकडे सिडको विभागाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या पुलावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसत आहे. उरण- नेरूळ रेल्वेच्या मार्गावरील हा उड्डाणपूल असून उरण शहरात ये जा करण्यासाठी असलेला. बोकडविरा ते उरण चारफाटा हा मार्ग नेरूळ ते उरण रेल्वे मार्गामुळे बंद करण्यात आला आहे. या रस्त्याला पर्याय म्हणून बोकडविरा ते नवीन शेवा असा उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे.