उरण : मोरा ते मुंबई दरम्यानची जलसेवा समुद्राच्या ओहोटीमुळे येत्या १९ जानेवारीपासून २५ जानेवारीपर्यंत चार तासांसाठी खंडीत होणार आहे. त्यामुळे, या मार्गावरील हजारो प्रवाशांचा खोळंबा होणार आहे. मोरा बंदरातील गाळामुळे प्रवासी बोटी धक्क्याला लागत नसल्याने ही सेवा दररोज तीन ते चार तासांसाठी खंडीत होणार आहे.

हेही वाचा – नवी मुंबई : जुना बटाटा हंगाम लवकरच संपणार; नवीन बटाटा पेक्षा जुना बटाट्याचे दर अधिक

हेही वाचा – मोदींच्या सभेसाठी नवी मुंबईतून १४२ गाड्यांचा ताफा रवाना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्याच्या रस्ते मार्गवरील प्रवासातील वाहतूक कोंडी, सिग्नल यासह वाढते प्रदूषण आदी प्रवासातील समस्यांना छेद देत आरामदायी व वेळेत होणारा सुखकर प्रवास म्हणून जलवाहतुकीवर प्रवासी अवलंबून आहेत. स्वातंत्र्य पूर्व काळापासून उरणच्या मोरा ते मुंबईपर्यंतची जलसेवा बारमाही सुरू असते. मात्र मोरा बंदरातील गाळ वाढू लागल्याने महिन्यातून दोन वेळा समुद्राच्या ओहटीच्या वेळी ही सेवा काही तासांसाठी खंडीत करावी लागते. याचा फटका या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसत आहे. येत्या आठवड्यात १९ जानेवारीला दुपारी १ वाजता बंद होऊन ती सायंकाळी ४ वाजता पुन्हा सुरू होईल. तर २० जानेवारीला १ वाजता बंद ५ वाजता सुरू, २१ जानेवारी २ वाजता बंद ६ वाजता सुरू, २२ जानेवारीला ३ वाजता बंद ६ वाजता सुरू, २३ जानेवारीला ४ वाजता बंद ७ वाजता सुरू, २४ जानेवारी ४ वाजता बंद ८ वाजता सुरू, तर २५ जानेवारीला ५.४५ ला बंद ८.१५ ला ही सेवा पूर्ववत सुरू होणार आहे.