‘केदारेश्वर बॅनर्जी सेंटर ऑफ अ‍ॅट्मॉस्फेरिक अँड ओशन स्टडीज’ची (केबीसीएओएस) स्थापना अलाहाबाद विद्यापीठात सन २००० मध्ये केंद्र शासनाच्या साहाय्याने झाली. प्रकल्पांसाठी पृथ्वीविज्ञान मंत्रालय, इस्रो-यूजीसीने निधी पुरवला. केबीसीएओएसच्या दक्षिण ध्रुव वैज्ञानिकांनी ‘अ‍ॅकॅडमी बॉरिस पेट्रोव्ह’ या खास जहाजातून अंटाक्र्टिक महासागरी वातावरणाच्या विदेचे विश्लेषण केले. ‘एमएन सहा सेंटर ऑफ स्पेस स्टडीज’ ही संस्था अलाहाबाद विद्यापीठाने केबीसीएओएसनंतर वर्षभरात स्थापन केली. केबीसीएओएसमध्ये एम.टेक. आणि पीएचडीच्या विद्यार्थ्यांना जमीन, वायुमंडल, सागर विज्ञानाचे अद्ययावत ज्ञान देऊन देशासाठी मोठय़ा जबाबदाऱ्या घेण्यास सक्षम केले जाते.   

हेही वाचा >>> कुतूहल : समुद्र जाणून घेताना..

Tamil Nadu teacher's unique video to capture happy student faces is viral
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी शिक्षिकेने केले असे काही…..Viral Video पाहून पोट धरून हसाल!
challenged to RTE new rules in High Court
पालक, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे! ‘आरटीई’ नव्या नियमांना उच्च न्यायालयात आव्हान
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
Professor arrested for taking bribe to accept PhD thesis
विद्येच्या माहेर घरात शिक्षणाचा बाजार! पीएचडीचा प्रबंध मान्य करण्यासाठी लाच घेणारी प्राध्यापिका अटकेत

 केबीसीएओएस स्वत:सारखे काम करणाऱ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संस्थांच्या संपर्कात असते.  उदा. अमेरिकेतील ‘लामॉन्ट डोहार्टी अर्थ ऑब्झव्‍‌र्हेटरी’, इटलीतील ‘इंटरनॅशनल थिऑरेटिकल फिजिक्स सेंटर’, पुण्यातील ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ट्रॉपिकल मिटीरिऑलॉजी’. या संस्था माहिती सामायिक करून परस्पर सहकार्याने अचूक हवामान प्रतिमाने तयार करतात. केबीसीएओएसचे साथीच्या रोगांच्या नियंत्रणासारखे प्रकल्प जनसामान्यांना उपयोगी पडतात. भारतात अजूनही मलेरिया मोठय़ा प्रमाणात आहे. मलेरियामुळे यकृत बिघडून रक्तपेशी फुटतात. अतिदुर्बल रोग्यांचे मृत्यूही होतात. केबीसीएओएससारख्या दूरस्थ विदा मिळवणाऱ्या वातावरणाचा सखोल अभ्यास करणाऱ्या संस्थांकडील माहितीमुळे मलेरियासारखे रोग आटोक्यात येऊ शकतात. पावसाळय़ानंतर मलेरियाचा प्रादुर्भाव वाढतो, फेब्रुवारी-एप्रिलमध्ये घटतो. ओरिसा, आसामसारख्या ईशान्येकडील राज्यांत मलेरिया-पीडित जास्त आहेत. भारतात रोगसंक्रमण कोठे  होईल, डास कधी वाढतील ही माहिती रोगनियंत्रणास उपयुक्त ठरते. पुढील ५० वर्षांत, जागतिक तापमानवाढ गृहीत धरून मलेरियाविरोधी धोरणे ठरवण्याजोगी माहिती केबीसीएओएस जमवत आहे. प्लास्मोडियम फॉल्सीपॅरम या जीवघेण्या मलेरियाकारकाची पाहणी महत्त्वाची ठरेल. जीव वाचतील. आरोग्य-मोहिमांचे पैसे, श्रम योग्य वेळी व योग्य जागीच खर्च होतील.

हेही वाचा >>> कुतूहल : समुद्र पक्ष्यांचे स्थलांतर

१९६१-२००५ या ४५ वर्षांत एल निनो, ला निनाने समुद्रप्रवाह-प्रभावित वर्षे आणि समुद्रप्रवाह-अप्रभावित वर्षे यांच्या तुलनेने भारतात हिवताप संक्रमणात फरक पडला का, ते पाहणार आहेत. त्याआधारे केबीसीएओएस २०५० पर्यंतच्या मलेरिया-संक्रमणाचे आडाखे बांधत आहे. पिकांना सूक्ष्म-तुषाररूपात पाणीपुरवठा करून परिणाम बघणे किंवा रांची, झारखंडमध्ये उपग्रहांच्या साहाय्याने जमिनीवरील गोडय़ा पाण्याचे स्रोत शोधणेही विचारात आहे. बिहारमध्ये पर्यटकांची आकर्षणकेंद्रे कोणती आहेत याचा केबीसीएओएसने अभ्यास केला आहे. तेथे विकास केल्यास प्रवाशांसाठी हॉटेले बांधून, रोजगारनिर्मिती करता येईल.

– नारायण वाडदेकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org संकेतस्थळ : www.mavipa.org