पालघर : प्रशासनाची नजर चुकवून जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील समुद्रकिनारी बेसुमार वाळू उत्खनन सुरूच आहे. अपुरे मनुष्यबळ व साधनांच्या अभावामुळे वाळू माफियांना  थोपवण्यात प्रशासनाला अपयश येत  आहे, असे सांगितले जाते, तरी पोलीस प्रशासनाच्या  आर्थिक हितसंबंधांमुळे हे प्रकार सुरू असल्याची  चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डहाणूत  दररोज रात्री व पहाटेच्या दरम्यान वाळू उत्खननाचा सपाटा सुरूच आहे. याचा मोठा दुष्परिणाम  पर्यावरणासह समुद्र किनारपट्टीवरील वस्त्या व गावांना होत आहे.  दररोज शेकडो ब्रास वाळू वाहतूक होत आहे.  वेगवेगळय़ा शकला लढवून व प्रशासनाची नजर चुकवून हे प्रकार होत आहेत. त्यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. उत्खननामुळे गेल्या आठ दहा वर्षांमध्ये समुद्रकिनारे खचले आहेत.  भरतीचे पाणी किनाऱ्यालगतच्या सुरुच्या बागा, वस्त्यांमध्येही  शिरत आहेत. त्यामुळे नागरिकाचे नुकसान होत आहे.  सुरुची अनेक झाडे उन्मळून पडू लागली आहेत. 

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Administration helpless face sand mafias failure insufficient manpower facilities amy
First published on: 24-03-2022 at 05:05 IST