पालघर : पश्चिम रेल्वेने डहाणूपर्यंत उपनगरीय क्षेत्र जाहीर करून तब्बल नऊ वर्षांचा कालावधी उलटला असला तरीही उपनगरीय सेवा मर्यादित असल्याने तसेच ऐन गर्दीच्या वेळी गाडय़ांची कमतरता भासत असल्याने डहाणू ते वैतरणा परिसरात राहणाऱ्या महिला प्रवाशांचे हाल होत आहेत.
भाजीपाला, मासळी विक्री तसेच नोकरीनिमित्ताने अनेक महिला घोलवड-डहाणूपासून वैतरणापर्यंत कामानिमित्त मुंबईच्या दिशेने प्रवास करत असतात. पहाटेपासून दुपापर्यंत चर्चगेटपर्यंत जाणाऱ्या थेट उपनगरीय गाडय़ांची संख्या मोजकी असल्याने अशा गाडय़ांमध्ये मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असते. तसेच महिलांच्या संख्येच्या तुलनेत उपलब्ध जागा कमी पडत असल्याने सर्व डब्यांमध्ये व विशेषत: महिलांच्या डब्यात तुफान गर्दी होत असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनाकाळात लांब पल्ल्याच्या गाडय़ा बंद करण्यात आल्या होत्या. या गाडय़ा पूर्ववत सुरू केल्यानंतर काही काळ त्यामध्ये महिलांसाठी आरक्षित डबा नव्हता. सध्या मुंबईकडे जाणाऱ्या आणि प्रमुख गाडय़ा असणाऱ्या वलसाड फास्ट पॅसेंजर या गाडीत महिलांसाठी दोन राखीव डबे, तर फ्लाइंग राणी सुपरफास्ट गाडीला महिलांसाठी एक डबा आरक्षित असला तरी महिला प्रवाशांची संख्या पाहता हा डबा महिलांसाठी अपुरा पडत आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Despite being a suburban area the number of trains is limited amy
First published on: 04-08-2022 at 00:04 IST