कासा: तलासरी तालुक्यातून गुजरात राज्याकडे प्रवाहित होणाऱ्या वरोली नदीपात्रात रासायनिक द्रव पदार्थ सोडल्यामुळे नदी प्रदूषित होऊन वडवली गाव हद्दीत हजारो मासे मृतावस्थेत आढळले आहेत. या नदीच्या पाण्यावर पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका उधभावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कुर्झे धरणाचे पाणी वरोली नदीतून तलासरी तालुक्यातील विविध गावातून गुजरात राज्यात जाते. या नदीपात्रात दापचरी रबर बोर्ड, टोलनाका आणि शिव मंदीर या भागातच रासायनिक द्रव पदार्थ टाकल्याने पाणी दूषित झाले आहे. या जल प्रदूषणामुळे मासे आणि अन्य जीव मृत झाले असून पाण्याला दुर्गंधी येत आहे. 

unclean water supply, Thane, Rumors of unclean water,
ठाणे, कल्याणात अशुद्ध पाणीपुरवठ्याची अफवा; पालिका प्रशासन म्हणाले, अफवांवर विश्वास ठेऊ नका
panvel, water shortage, water shortage in Karanjade, Karanjade, water shortage on gudhipadwa, protest for water shortage, Karanjade citizens, panvel citizens, marathi news,
पनवेल : करंजाडेतील रहिवासी अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे चिंतेत
navi mumbai, Water Supply Worker, neglect, Leads to Flood Like Situation, main valve broke, water entered the chalwl, water supply workers slept, water waste, kopar khairane news, navi mumbai news, water news, marathi news, water leakage in kopar khairane,
नवी मुंबई : निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी, कर्मचाऱ्यांची झोप नडली; रहिवाशांनी रात्र जागून काढली
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार

महाराष्ट्र गुजरात सीमेवर तलासरी तालुका वसला असून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग येथून जातो. जवळच उंबरगाव, वापी, सेलव्हासा, बोईसर एमआयडीसी अशा मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत.  महामार्गाने जात असताना टँकर मधून रासायनिक पदार्थ वरोली नदीपात्रात टाकण्याच्या घटना पूर्वी देखील घडल्या आहेत. चोरट्या मार्गाने प्रदूषित रासायनिक द्रव पदार्थ अज्ञातांनी सोडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकारामुळे  पाणी दूषित झाले असून मासे मृत झाले आहेत व मृत माशांचा खच पाण्यावर तरंगत आहे. यामुळे जलचारांवर मृत्यूची टांगती तलवार आहे. 

वडवली येथून हे दुषीत पाणी सवणे येथे पोचले आहे.  नदीचा प्रवाह वडवली, सवणे, वंकास, धामणगाव, करजगाव, वसा, झरी, वेवजी, गिरगाव, घिमानिया या डहाणू व तलासरी तालुक्यातील आदिवासी बहुल गावातून गुजरात राज्यात संजाण शहरातून वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळते. त्यामुळे हे प्रदूषित पाणी वाहून मोठा धोका उदभवू शकतो हे लक्षात घेत स्थानिक नागरिकांनी तलासरी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देऊन जलप्रदूषण करणाऱ्यां विरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.