नीरज राऊत

पालघर: केंद्र सरकारच्या बौद्धिक संपदा विभागाने २९ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या भौगोलिक उपदर्शन पत्रिकेमध्ये देशातून प्राप्त झालेल्या ५० अर्जांना मान्यता देऊन भौगोलिक मानांकन देण्याचे निश्चित केले आहे. यामध्ये पालघर जिल्ह्यातील बहाडोली तसेच ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील जांभूळ या फळाला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. यासह राज्यातील एकंदर नऊ वस्तूंना तसेच कला व संस्कृतीशी संबंधित चार अर्जांना मान्यता देण्यात आली असून त्यामध्ये पेण येथील गणेश मूर्तींचा समावेश आहे.

India Meteorological Department issued rain warning for Nagpur district but there is no rain Nagpur
शाळांना सुटी अन्ं पावसाने मारली दांडी; हवामान खात्याचा अंदाज पुन्हा…
mahavitaran latest marathi news
महावितरण ऊर्जामंत्र्यांच्या जिल्ह्यातील ग्राहकांना २७.७८ कोटी देणार..झाले असे की…
oily spot disease on pomegranate due to continuous rain
डाळिंबावर तेल्या रोगाचे संकट; दुष्काळी पट्ट्यातील सततच्या पावसाचा परिणाम
Mudrank Abhay Yojana, stamp duty, registration fee, penalty, state government, flat owners, extended deadline, recovery, second phase, concession, house owners
मुद्रांक अभय योजनेतून ३९३ कोटींचा महसूल, ५६ हजार प्रकरणे निकाली
job opportunities in punjab national bank
नोकरीची संधी : पंजाब नॅशनल बँकेतील संधी
Barcelona Protest against tourists Why are people squirting water on tourists in Barcelona
‘पर्यटकांनो, घरी जा!’ बार्सिलोनामधील स्थानिक लोक पर्यटकांवर पाण्याचे फवारे का मारत आहेत?
Arm mobile app will work for information about accidental death of wild animals
वन्यप्राण्यांच्या अपघाती मृत्यूच्या माहितीसाठी काम करणार ‘आर्म’ भ्रमणध्वनी ॲप
Illegal sale of weapons in the state three arrested
राज्यात बेकायदेशीरपणे शस्त्र विक्री, तिघांना अटक; ८ पिस्तुल आणि १३८ काडतुसे जप्त

देशभरातील विविध संस्था, उत्पादक संघ, शेतकरी गट, कल्याणकारी मंडळ, संवर्धन संघ आदींनी भौगोलिक मानांकनासाठी अर्ज केले होते. या अर्जांवर देशभरात विविध ठिकाणी सुनावणी होऊन २९ नोव्हेंबर रोजी प्रकाशित झालेल्या भौगोलिक उपदर्शन प्रक्रियेत केंद्र सरकारने मान्य केलेल्या भौगोलिक मानांकना अर्जाचा तपशिल प्रसिद्ध केली आहे. या यादीत राज्यातील १३ अर्जांना मान्यता मिळाली असून ग्रामीण संस्कृती तसेच ग्रामीण भागातील संबंधित राज्यातील अनेक वस्तूंना भौगोलिक मानांकन प्राप्त झाल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा… पालघर : कालव्यांच्या दुरवस्थेमुळे सूर्या प्रकल्पाच्या सिंचनक्षेत्रात सातत्याने घट, आधुनिक सिंचन प्रणालीकडे दुर्लक्ष

२४ मे २०२२ रोजी अर्ज करणाऱ्या बदलापूर येथील जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास चॅरिटेबल ट्रस्ट तसेच २९ ऑगस्ट २०२२ रोजी बहाडोली येथील बहाडोली जांभूळ उत्पादक शेतकरी गट यांचे अर्ज मान्य करण्यात आले असून जांभळाच्या दोन्ही ठिकाणी असलेली वेगवेगळी ऐतिहासिक व भौगोलिक पार्श्वभूमी व वैशिष्ट्ये विचाराधीन घेऊन त्यांना स्वतंत्रपणे मानांकन देण्यात आले आहे.

याच बरोबरीने नंदुरबार येथील आमचूर, नंदुरबार येथील मिरची, पानचिंचोळी (लातूर) येथील चिंच, बोरसुरी (लातूर) येथील तुर डाळ, कस्ती (लातूर) येथील कोथिंबीर, बदनापूर जालना येथील दगडी ज्वारी, उदगीर (लातूर) येथील कुंठाळगिरी खवा यांना भौगोलिक मानांकन देण्यात आले आहे. तसेच पेण येथील गणेश मूर्ती, सावंतवाडी येथील लाकडी हस्तकला व मिरज येथील तानपुरा यांना देखील भौगोलिक मानांकन देण्यात आले आहे.

हेही वाचा… ‘जेएनपीए’ची माहिती फसवी, संघर्ष समितीचा आरोप; प्रदूषण नियंत्रण विभागाच्या कारवाईकडे जनतेचे लक्ष

बहाडोली जांभळाची भौगोलिक मानांकनकडे वाटचाल

अनेक दशकांपासून प्रसिद्ध असणाऱ्या बहाडोली येथील जांभळांना भौगोलिक मानांकन मिळावे यासाठी सन 2018 पासून प्रयत्न सुरू झाले. मोठा आकार, मांसाळ व रसाळ व लहान आकाराची बी असणाऱ्या या फळाला भौगोलिक मानांकन मिळावे या दृष्टिकोनातून बहाडोली जांभूळ उत्पादक शेतकरी गट स्थापन करून या जांभळाशी संबंधित ऐतिहासिक तसेच भौगोलिक पुरावे गोळा करण्यासाठी जगदीश पाटील यांच्या समन्वयाने प्रयत्न सुरू केले. या फळाचे रासायनिक विश्लेषण खाजगी प्रयोगशाळेतून करणे खर्चीक असल्याने कृषी विभागाने केलेल्या रासायनिक विश्लेषणाचा आधार घेण्यात आला. सूर्या व वैतरणा या दोन नद्यांच्या संगमावर वसलेल्या या गावात गाळाची जमीन असल्याने येथील फळाला असणारे विशिष्ट चव व औषधी गुण यांचा अभ्यास करत कृषी विभागातील अधिकाऱ्यांची मदत घेऊन भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी प्रस्ताव खाजगी तज्ञ सल्लागारांच्या माध्यमातून सादर करण्यात आला. त्याबाबत मुंबई येथे सुनावणी झाल्यानंतर बहाडोली येथील जांभळाला भौगोलिक मानांकन देण्यात आले.

भौगोलिक मानांकन मिळालेल्या राज्यातील विविध अर्जांमध्ये पहिल्यांदाच ग्रामीण भागातील पदार्थांना तसेच ग्रामीण संस्कृतीची निगडित वस्तूंना भौगोलिक मानांक प्रप्त झाले आहे. अनेक ठिकाणी पुराणकाळातील ज्या वस्तूंचे महत्त्व होते, ते वृक्षतोड झाल्यामुळे किंवा शहरीकरण झाल्याने याची उपलब्धता कमी झाली होती. जांभूळ, चिंच, डाळ, कोथिंबीर सारख्या पदार्थांना भौगोलिक मानांकन मिळाल्याबद्दल समाधान वाटत आहे – गणेश हिंगमिरे, भौगोलिक मानांकन, तज्ञ व सल्लागार