पालघर: मे महिन्याच्या अखेरीस या हंगामातील सर्वाधिक उधाण (मोठी भरती) मुळे जिल्ह्यातील सातपाटी व अन्य समुद्रकिनाऱ्यावर धूप व नुकसान झाल्याच्या घटना घडल्या होत्या. जून महिन्याच्या २४ ते २९ तारखेपर्यंत पुन्हा मोठ्या उंचीच्या लाटा उसळणार असून पाऊस व वारा यामुळे त्यांची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. समुद्रकिनारी असणाऱ्या घरांची तसेच किनाऱ्यालगत नांगरून ठेवलेल्या बोटींच्या सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवणार आहे.

मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात पाच मीटर पेक्षा अधिक उंचीच्या लाटा पालघर जिल्ह्याच्या किनाऱ्यावर आदळल्याने अनेक किनाऱ्यांची धूप होऊन किनाऱ्यालगतची झाडे पडण्याचे प्रकार घडले होते. त्याचप्रमाणे सातपाटी येथील दांडा परिसरात दोन घरांची पडझड झाली होती. सातपाटी किनाऱ्यावर २७ मे (५.८४ मीटर), २८ मे (५.८६ मीटर) तर २९ मे रोजी (५.७३ मीटर) लाटांची नोंद झाली होती.

त्या खालोखाल १० ते १५ जुलै, २३ ते २८ जुलै, ८ ते १३ ऑगस्ट, २२ ते २६ ऑगस्ट, ६ से ११ सप्टेंबर व २४-२५ सप्टेंबर दरम्यान सातपाटी समुद्रकिनाऱ्यावर पाच मीटर पेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे जारी केलेल्या भरतीच्या वेळापत्रकात नमूद करण्यात आले आहे. पावसाळ्यामध्ये असणारा वेगवान वारा तसेच खाडी मधून मोठ्या प्रमाणात समुद्रात मिसळणारे पाणी यामुळे या लाटांची तीव्रता वाढत असून यामुळे समुद्रकिनाऱ्यावरील नांगरलेल्या बोटी तसेच किनाऱ्यावरील जैवविविधतेला नुकसान पोहोचण्याची शक्यता आहे.

डहाणू किनाऱ्यावर सर्वाधिक उंची

समुद्री लाटांची उंची विषुववृत्त पासून उत्तरेकडे गेल्यानंतर वाढत असल्याचे भरती वेळापत्रकावरून दिसून येत असून अमावास्या व पौर्णिमा यांच्या दोन-तीन दिवस अलीकडे व पलीकडे समुद्री लाटांची तीव्रता अधिक असल्याचे दिसून आले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सागरी मंडळाने जारी केलेल्या वेळापत्रकात डहाणू समुद्रकिनाऱ्यावरील लाटांची उंची सातपाटी, केळवे व अर्नाळा या किनाऱ्यांपेक्षा काही प्रमाणात अधिक असल्याचे देखील दिसून आले आहे.

पालघर जिल्हा हा महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावरील एक महत्त्वाचा जिल्हा आहे. येथील समुद्रकिनारे – विशेषतः दाहाणू, केळवा, साटपाटी, चिखले, तारापूर, वाडा, आणि महिम – हे भरतीच्या (High Tide) वेळेस मोठ्या प्रमाणावर प्रभावित होतात. खाली भरतीचा स्थानिक परिणाम दिला आहे:

पालघर जिल्ह्यातील भरतीचे प्रमुख परिणाम:

1. खेड्यांमध्ये पूरपरिस्थिती

भरती आणि पावसाचा संगम झाल्यास साटपाटी, केळवा, तारापूर या किनारपट्टी भागात घरांत पाणी शिरणे, शेतजमीन जलमय होणे, व जिवनावश्यक वस्तूंना नुकसान होतो.

खारफुटी जंगलांमध्ये पाणी साचून डासजन्य आजारांचा धोका वाढतो.

2. मत्स्य व्यवसायावर प्रभाव

भरतीमुळे मासेमारी करणाऱ्या होड्या व जाळी वाहून जाण्याचा धोका वाढतो.

समुद्रात मासे खोलवर जातात, त्यामुळे मासेमारीला मर्यादा येतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हादळ व लाटांमुळे मासेमार बंदरांवर नुकसान होण्याची शक्यता.