पालघर : रेशन, पाणी आणि रोजगार हमीमध्ये काम द्या, अशा प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेमार्फत सुमारे १२००० महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढून कार्यालयाला घेराव घातला आहे.

या मागण्यांसाठी अनेक वेळा तहसीलदार कार्यालयांकडे आंदोलने केली गेली, मात्र त्यातून काहीही साध्य झाले नसल्याने आज या महिलांनी आक्रोश व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. कोळगाव येथील पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्यालय परिसरामध्ये हा संपूर्ण मोर्चा विसावला असून, त्यांना संभाळताना प्रशासनासह पोलिसांची मोठी तारांबळ उडाल्याचे दिसून आले.

Traffic changes in Divisional Commissioner office area due to show of force by candidates Pune news
उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनामुळे विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात वाहतूक बदल… काय आहेत बदल?
BJP candidate Ramdas Tadas has two offices in the city without obeying the order of Amit Shah
अमित शहांचा आदेश पाण्यात, भाजप उमेदवाराची शहरात दोन कार्यालये
Wardha Lok Sabha, Amar Kale,
वर्धा : “कुणी घर देता कां घर…”, अमर काळे यांची शोधाशोध; कार्यालयासाठी…
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

हेही वाचा – पालघर: जंतुनाशक खरेदीत गैरव्यवहार? कचरा ठेक्यानंतर पालघर नगर परिषद पुन्हा वादात

विभक्त कार्डावर रेशन द्यावे, दोन तीन रुपयांना मिळणारे रेशन त्वरित सुरू करावे, रोजगार हमीची कामे त्वरित सुरू करावी, सुरू असलेल्या कामावरची ऑनलाइन हजेरी बंद करावी, हर घर नल जलजीवन मिशन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, विजेचे बील कमी व्हावे, अशा मागण्या महामोर्चाच्या माध्यमातून महिला संघटनेने केल्या.