शासनाकडे तक्रार, लाभार्थीकडून आहार परत 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर: जव्हार तालुक्यातील अंगणवाडीअंतर्गत लहान मुले, गरोदर व स्तनदा मातांना देण्यात येणाऱ्या पोषक आहार हा निकृष्ट असल्याची तक्रारी शासनाकडे करण्यात आली आहे. लाभार्थीनी हा आहार शासनाला परत केला आहे. जव्हार नगर परिषद यांच्या अंतर्गत  बारा अंगणवाडी केंद्र ही शहरी भागात येतात. या अंगणवाडय़ा भिवंडी बाल विकास प्रकल्पअंतर्गत जोडलेल्या आहेत. या अंगणवाडी केंद्रात सात महिने ते सहा वर्षे मुलांसाठी तसेच गरोदर व स्तनदा मातांसाठी कच्चे धान्य अर्थात पोषक आहार दिला जात आहे. मात्र देण्यात येणारा आहार हा निकृष्ट असल्याचा  अंगणवाडी क्षेत्रातील महिलांनी म्हटले आहे.  या आहाराच्या पाकिटावर या आहाराच्या वस्तूंचे उत्पादन कोणी केले, उत्पादनाची दिनांक, आहार किती महिने किंवा किती दिवसांपर्यंत वापरता येऊ शकतो अशा माहितीचा उल्लेख केलेला नाही.  तसेच लाभार्थी मातांनी या आहारात पुरवलेल्या शिरा, सुकडीच्या दर्जाबाबतच्या तक्रारी केल्या आहेत. शासनातर्फे पुरवण्यात आलेला उपमा खूप तिखट आहे, शिरांमध्ये साखर नाही तसेच सुकडी व बालभोग व्यवस्थित शिजत नाही, तसेच हळद, तिखट खराब दिले आहे अशा स्वरूपाच्या तक्रारी पुढे आल्या आहेत.  आहारसंदर्भात त्रुटी निदर्शनास आल्याने महिलांनी  त्याबाबतच्या तक्रारी शासकीय व्यवस्था व श्रमजीवी संघटनेकडे केल्या आहेत.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students children poor diet complaint government ysh
First published on: 26-01-2022 at 00:02 IST