सुहास सरदेशमुख लोकसत्ता

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचे राजकीय दुकान चालावे म्हणून औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा मुद्दा हाती घेतला. ३०- ३५ वर्षापासून त्यावर घाणरडे राजकारण सुरू आहे. खरे प्रकरण न्यायालयात असताना केंद्र सरकारने घेतलेला निर्णय आम्ही सर्वोच्च न्यायालयापेक्षाही मोठे आहोत असे सांगणारा आहे त्यामुळे निर्णयामागे हुकुमशाही वृत्ती दिसते अशी टीका करत एमआयएमचे खासदार इत्मियाज जलील यांनी आम्ही आमची नाराजी रस्त्यावरही व्यक्त करू, त्यासाठी कोणत्या प्रकारचे आंदोलन करायचे यावर शहरातील विविध व्यक्तीशी चर्चा करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> विमानतळाच्या मागणीतही भाजपामधील गटबाजीचे प्रदर्शन

. जी- २० समूह देशातील प्रतिनिधी औरंगाबादमध्ये येत असल्याने कोणतेही आंदोलन करू नये अशी विनंती करणारे दूरध्वनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले होते. जगभरात चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून आम्ही शांत राहिलो पण या निर्णयाच्या अनुषंगाने असणारी नाराजी व्यक्त केली जाईल. हा लढा आम्ही लढूच असे जलील यांनी म्हटले आहे.

औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यामागे महापुरुषांचा आपण सन्मान करतो आहोत असे जर कोणाला वाटत असेल तर तसे नसते. महापुरुष हे मोठेच असतात. आम्हालाही संभाजीमहाराजांचा आदरच आहे. पण केवळ घाणेरड्या राजकारणासाठी हे सारे घडवून आणले गेले. खरे तर नामांतर प्रक्रियेवर आक्षेप घेण्यासाठी २७ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. पण तत्पूर्वीच हा निर्णय घेण्यात आला. अशा प्रकारे निर्णय घेतल्यानंतर त्याला हिंदू- मुस्लिम व्देषाची किनार लावली जात आहे.

हेही वाचा >>> रायगडमध्ये भाजपची लोकसभेची तयारी, शेकापला आणखी गळती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जर महापुरुषांचीच नावे द्यायची असतील तर महात्मा ज्योतिबा फुले यांची जन्मभूमी असणाऱ्या पुण्याचे नाव फुलेनगर करावे, कोल्हापूरचे नाव शाहूनगर करावे, नागपूरचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरी करावे आणि मुंबईचे नाव छत्रपती शिवाजीराजे नगर करावे. तसे प्रस्ताव राज्यकर्त्यांनी आणले तर त्याला एमआयएमचा विरोध असणार नाही. पण केवळ राजकारणासाठी हे सारे सुरू असल्याने या निर्णयास विरोध केला जाईल. न्यायालयीन लढा आणि रस्त्यावर उतरुन हा लढा दिला जाईल असे जलील म्हणाले. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी हा विरोध पक्ष म्हणून तर असेलच पण त्याशिवाय तो ‘ औरंगाबादकर’ म्हणून नोंदविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी दोन बैठका झाल्या असून आखणी काही बैठका घेतल्यानंतर आंदोलन हाती घेऊ असे जलील यांनी सांगितले.