आतापर्यंतच्या लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वात कमी ९ मतांनी दोन उमेदवार विजयी झाले आहेत. त्याच वेळी सर्वाधिक मताधिक्य हे ६ लाख, ९६ हजार एवढे आहे. सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा इतिहास बीडच्या प्रीतम मुंडे यांनी रचला होता. १९६२ पासून सर्वात कमी मतांनी विजयी झालेले उमेदवार : १९६२ : रिशांक किशिंग - मणिपूर (सोशालिस्ट पार्टी) : ४२ मते १९६७ : एम. राम - हरयाणा (काँग्रेस) : २०३ मते १९७१ : एम. एस. सिवास्वामी - तमिळनाडू (द्रमुक) : २६ मते १९७७ : दाजीबा देसाई - कोल्हापूर , महाराष्ट्र (शेकाप) : १६५ मते १९८० : रामनयम राम - उत्तर प्रदेश ( काँग्रेस) : ७७ मते १९८४ : मेवा सिंग - पंजाब (अकाली दल) : १४० मते १९८९ : के. रामकृष्ण - आंध्र प्रदेश (काँग्रेस) : ९ मते १९९१ : राम अवध - उत्तर प्रदेश (जनता दल) : १५६ मते १९९६ : सत्यजितसिंह गायकवाड - गुजरात (काँग्रेस) : १७ मते हेही वाचा : Celebrity Fight: कंगनासमोर राजघराण्यातील वंशजाचे आव्हान; सोनिया गांधींनी केली वाट बिकट १९९८ : सोम मरांडी - बिहार (भाजप) : ९ मते १९९९ : प्यारेलाल शंकवार - उत्तर प्रदेश ( बसपा) : १०५ मते २००४ : डॉ. पी. पुखनीकोया - लक्षद्विप ( जनता दल-युनायटेड) : ७१ मते २००९ : नरो नारायण - राजस्थान (काँग्रेस) : ३१७ मते २०१४ : टी. चेवांग - लडाख (भाजप) : ३६ मते २०१९ : भोलेनाथ - उत्तर प्रदेश (भाजप) : १८१ मते (संकलन : संतोष प्रधान)