scorecardresearch

Premium

Bihar caste survey: बिहारच्या राजकारणातील ईबीसी गटाचे महत्त्व

सर्वात आधी लालू प्रसाद यादव यांनी ईबीसी वर्गाला आपल्या आघाडीत कसे घेता येईल? यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर नितीश कुमार यांनीही ईबीसी गटाशी जवळीक साधली.

Caste-Census-Bihar
बिहारमध्ये झालेल्या जातीनिहाय सर्वेक्षणाचा अहवाल प्राप्त झाला असून त्यात त्यात ईबीसी वर्गाची संख्या जास्त असल्याचे निष्पन्न झाले आहे. (Photo – ANI)

बिहार सरकारने राज्यभरात केलेल्या जातीनिहाय सर्वेक्षणाचा अहवाल सोमवारी (दि. २ ऑक्टोबर) रोजी प्राप्त झाला. ज्यामध्ये राज्यात सर्वदूर विखुरलेला ‘अत्यंत मागासवर्गीय समाज’ (Extremely Backward Classes – EBC) तब्बल ३६.०१ टक्के असल्याचे समोर आले आहे. ईबीसी प्रवर्गात १३० विषम गट आणि उप समूह आहेत. ज्यामध्ये न्हावी, कोळी (ज्यांची सहानी, निषाद, केवत अशी आडनावे आढळतात), लोहार, तेली आणि नोनिया (नोन किंव नून (मीठ) तयार केल्यामुळे हे नाव पडले) या जातींचा प्रामुख्याने या वर्गात समावेश असून त्यांची संख्या इतर जातींपेक्षा लक्षणीय आहे. या पाचही जाती जगण्यासाठी प्रभावशाली गटावर अवलंबून आहेत, या जातींना बिहारमध्ये पाचपुनिया असेही म्हटले जाते.

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी सर्वात आधी ईबीसी गटाचे सामाजिक अंकगणित हेरले, या गटातील जातींची एकत्रित संख्या ही इतर कोणत्याही प्रभावशाली गटापेक्षा अधिक आहे. जसे की, यादव (जातीनिहाय जनगणनेनुसार १४.२७ टक्के लोकसंख्या) आणि मुस्लीम (जवळपास १७ टक्के) यांच्या संख्येपेक्षाही ईबीसींची संख्या अधिक आहे.

Haryana-BJP-leader-Birendra-Singh
इंडिया आघाडी एकजुटीने लढली, तर भाजपाला मिळेल कडवी झुंज; भाजपा नेत्याचे स्पष्टीकरण
Nitish Kumar and Sanjay Kumar Choudhary
भाजपच्या टीकेमुळे बिहारच्या राजकारणाला वळण; आपण हिंदूविरोधी नाही दाखविण्याचा नितीश कुमार यांचा प्रयत्न
Manoj Jarange Patil
संभाजी भिडेंच्या पाठिंब्यानंतर मनोज जरांगे पाटील म्हणतात, “आमच्यासाठी आरक्षण महत्त्वाचं आहे, मग ते…”
Gita Gopinath
पीएम मोदींचे ‘हे’ मोठे स्वप्न येत्या ४ वर्षांत पूर्ण होणार, भारत अनेक बड्या देशांना मागे टाकणार, IMF च्या गीता गोपीनाथ यांच्याकडून शिक्कामोर्तब

हे वाचा >> Bihar Caste Survey : ईबीसी वर्गाची संख्या सर्वाधिक; बिहारचे जातीय समीकरण कसे आहे?

लालू प्रसाद यादव यांनी सर्वात आधी मोठ्या कुशलतेने या गटाला पंचफोरान (पाच मसाल्यांचे मिश्रण) असे नाव दिले. यामागची कल्पना अशी होती की, कोणत्याही खाद्यपदार्थात जर पंचफोरान टाकले तर त्या पदार्थाची चव आणखी चांगली होते. त्याचप्रकारे ईबीसी कोणत्याही आघाडीत समाविष्ट करता येतात.

दुसरीकडे नितीश कुमार यांना कोणत्याही सामाजिक गटाचा पाठिंबा नव्हता. नितीश कुमार मुख्यमंत्री असताना ईबीसी गटाला आरक्षण, शैक्षणिक मदत आणि कल्याणकारी योजनांचा लाभ देऊन जवळ करण्याचा प्रयत्न केला. भाजपानेदेखील या गटाला कुरवाळण्याचा प्रयत्न केला आहे. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःची जात आणि चहावाला ही प्रतिमा पुढे करून ईबीसी गटाचा पाठिंबा भाजपाला मिळवून दिल्याचे दिसते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bihar caste survey the importance of being ebc in state kvg

First published on: 02-10-2023 at 20:40 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×