‘नितेशने जपून बोलावे’ या निलेश राणे यांच्या सल्ल्याने नारायण राणे यांचे पुत्र नितेश व निलेश या दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे. या वादात वडिलांची मध्यस्थी उपयोगी पडते का हे बघायचे.नितेश राणे हे भाजपचे मंत्री असून, प्रखर हिंदुत्वाचा भाजपचा मुद्दा ते सातत्याने मांडत असतात. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी भाजपने मागे नितेश राणे यांच्यावर सोपविली होती. निलेश राणे हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. वडिल नारायण राणे हे भाजपचे खासदार, नितेश भाजपेच मंत्री तर निलेश हे शिवसेनेचे आमदार असे घरात त्रांगडे आहे. नितेश आणि निलेश याा राणे बंधूंमधील वादाची चर्चा फार पूर्वीपासून होत असे. पण पहिल्यांदाच त्याचा जाहीर स्वरुप मिळाले. नितेश राणे यांना मिळणारे महत्त्व निलेश यांना झोंबत असावे, अशी कोकणातील राणे समर्थकांची भावना आहे.

‘निकेशने जपून बोलावे.. मी भेटल्यावर बोलेनच पण बोलताना भान ठेवून बोलले पाहिजे’ अशा स्वरुपाचा मजकूर आमदार निलेश राणे यांनी एक्स या समाज माध्यमावरून प्रसारित केला. त्यावर नितेश राणे यांच्याकडून ‘निलेशजी तुम्ही टॅक्स फ्री आहात’, असे प्रत्युत्तर देण्यात आले. हा वाद समाज माध्यमांमध्ये समोर येताच त्यावर चर्चा सुरू झाली. थोड्या वेळाने निलेश राणे यांनी आपल्या भावाला दिलेल्या सल्ल्याचा मजकूर एक्स वरून हटविला. कदाचित नारायण राणे यांनी मध्यस्थी केली असावी किंवा महायुतीच्या नेत्यांनी त्यात लक्ष घातले असावे. पण यातून राणे बंधूंमधील वादाला तोंड फुटले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धाराशिव जिल्ह्यात एका कार्यक्रमात बोलताना मंत्री नितेश राणे यांनी भाजपचे सरकार असल्याचे लक्षात ठेवावे. त्यांचा सारा रोख हा जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांना होता. यावरून शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. त्यातूनच बहुधा निलेश राणे यांनी बंधूना लक्ष्य करण्याची संधी सोडली नसावी.लागोपाठ दोन लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्यावर निलेश राणे यांनी घरात नाराजी व्यक्त केली होती. नितेश राणे हे आमदार व त्यांना महत्त्व मिळते पण आपल्याकडे दुर्लक्ष होते, अशी त्यांची भावना होती. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून भाजपच्या वतीने लोकसभा लढण्याची त्यांची इच्छा होती. पण भाजप नेतृत्वाने निलेश राणे यांना उमेदवारी देण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला होता. यामुळे नारायण राणे यांना रिंगणात उतरावे लागले. विधानसभा निवडणुकीत कुडाळ मतदारसंघातून लढण्याची त्यांची इच्छा होती. पण हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात होता. शेवटी एकनाथ शिंदे यांनी निलेश राणे यांना उमेदवारी दिली.