पुणे : कार्तिकी यात्रा आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. कार्तिकी एकादशीनिमित्त वारकऱ्यांनी आज माऊलींच्या समाधीचे दर्शन घेऊन शेतकऱ्याला सुगीचे दिवस यावेत, सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, सरकारला सद्बुद्धी द्यावी असे साकडे घातले.

हेही वाचा : श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एकाही रुग्णालयात जळीत कक्षच नाही; ‘ससून’वर मदार

Bhoomipujan, Mahaprasad Gruh,
सोलापूर : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ६५ कोटी खर्चाच्या नव्या महाप्रसादगृहाचे भूमिपूजन; एक लाख भाविकांना महाप्रसादाचा लाभ
Shivaji maharaj, wagh nakh, satara,
शिवशस्त्रशौर्यगाथा या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन – जितेंद्र डुडी
Horse arena in Tukoba palanquin ceremony Pune print news
‘रिंगण सोहळा पाहिला म्या डोळा’; तुकोबांच्या पालखी सोहळ्यात अश्वांचे रिंगण
sant dnyaneshwar maharaj palkhi sohla
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण अलोट उत्साहात
mp balyamama mhatre
लोणावळा: आई एकविराच्या विश्वस्तपदी खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांची वर्णी; अजित पवारांच्या आमदाराने केली मदत
Demand for stone idols of Vitthal Rukmini
आषाढी वारीच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणीच्या दगडी मूर्तींना मागणी, पंढरपूरमधली बाजारपेठ सजली
Pune, Traffic Advisory for sant Dnyaneshwar and Tukaram maharaj palakhi sohala, Traffic Advisory for sant Dnyaneshwar maharaj palakhi sohala, Traffic Advisory for sant Tukaram Maharaj palakhi sohala, palkhi sohla Updates Available on Google Maps,
पालखी सोहळा, वाहतूक बदल, पर्यायी मार्गांची माहिती घ्या एका ‘क्लिक’वर…पुणे पोलिसांकडून यंदा ‘गुगल मॅप’चा वापर
Alandi, Dnyaneshwar Mauli,
आळंदी: संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती, टाळ- मृदंगाच्या गजरात वारकरी तल्लीन

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी यात्रेनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या जयघोषात दाखल झाले आहेत. पवित्र इंद्रायणीत स्नान करून माऊलींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी वारकरी दर्शनरांगेत लागले आहेत. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील भाविक मोठ्या प्रमाणावर आले आहेत. यावेळी माऊलींच्या समाधीचं दर्शन घेऊन आलेल्या वारकऱ्यांनी भावना व्यक्त करत ह्या सरकारला सद्बुद्धी द्यावी, त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, शेतकऱ्यांना सुगीचे दिवस यावेत असे साकडे घातल्याचे म्हटले आहे. नुकतंच, आस्मानी संकटाने शेतकरी संकटात सापडला. अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. अनेक शेतकरी अद्यापही सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.