बारामती : ‘ऑपरेशन सिंदूर’मागील भारताची भूमिका जागतिक स्तरावर बहुसंख्य देशांनी स्वीकारली असून, राजनैतिक मुत्सद्देगिरीत भारत यशस्वी ठरला आहे,’ असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

विद्या प्रतिष्ठानाच्या वतीने गदिमा सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. खासदार सुळे म्हणाल्या, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेबाबतची भूमिका जागतिक स्तरावर पोहोचावी, यासाठी सात खासदारांचे गट तयार केले. त्यांना चार देशांमध्ये जाऊन भूमिका मांडण्यास सांगण्यात आले होते. त्यांपैकी एका गटाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्यानुसार दक्षिण आफ्रिका, कतार, इजिप्त आणि इथिओपिया या देशांमध्ये जाऊन तेथील प्रमुखांना भेटून भारताची भूमिका मांडली. त्या वेळी संबंधित देशांबरोबर भारताचे राजनैतिक संबंध उत्तम असल्याचे दिसून आले.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मी युद्धाचे समर्थन करत नाही. शांतता आणि चर्चेच्या माध्यमातूनच प्रश्न सोडविण्यात यावेत, असे माझे मत आहे. देशाने योग्य वेळी युद्धबंदी केली. या निर्णयाचे जगाने स्वागत केले आहे,’ असेही त्या म्हणाल्या.