पुणे : ‘पुस्तके माणसाला शहाणे करून सोडतात. विचार करायला प्रवृत्त करतात. मात्र, कधी कधी माणसांनी विचार करू नये, ते अतिशहाणे व्हावेत म्हणून बड्या योजना आखल्या जातात. दुर्दैवाने त्यात कधी कधी सरकारही सामील असते. त्यामुळे सावध राहून वाचायला हवे,’ असे मत प्रसिद्ध कवी व अभिनेते किशोर कदम यांनी रविवारी व्यक्त केले. अक्षरधारा आणि राजहंस प्रकाशनाच्या वतीने आयोजित ‘पुस्तकांचा मान्सून’ या महोत्सवात कदम यांनी पुस्तकांवर आधारित कवितांचे सादरीकरण केले. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय पुस्तक न्यासचे विश्वस्त राजेश पांडे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, ‘राजहंस’चे शिरीष सहस्रबुद्धे, ‘अक्षरधारा’चे रमेश राठिवडेकर, रसिका राठिवडेकर या वेळी उपस्थित होत्या.

कदम म्हणाले, ‘विकत घेतलेली सगळीच पुस्तके लगेच वाचली जात नाहीत. मात्र, पुन्हा कधी तरी वाचण्याच्या उद्देशाने ती घेतली जातात. प्रत्येक पुस्तकाचे एक नशीब असते. ती वाचायची वेळ असते. ठरवून पुस्तक वाचले जात नाही. जोपर्यंत पुस्तके विकणारी आणि ती विकत घेणारी माणसे आहेत, तोपर्यंत पुस्तकांची परंपरा संपणार नाही.‘सध्या संवादचे रूपांतर कधी भांडणात होते, हे कळत नाही. आज भावनिक उष्मांक वाढलेला समाज आहे. या समाजाच्या स्वास्थ्यासाठी सहृदयतेचा पाऊस गरजेचा आहे,’ असे मत जोशी यांनी व्यक्त केले.सिद्धार्थ बेंद्रे यांनी सूत्रसंचालन केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तरुणांना व्यक्त व्हायला व्यासपीठ मिळाले की, ते योग्य दिशेला वळतात. वाचणाऱ्या तरुणांची संख्या वाढते आहे. युवकांना व्यासपीठ मिळाले तिथे योग्य मार्गाकडे जातात. आता पुण्याला जगातील पुस्तकांची राजधानी म्हणून ओळख मिळवून द्यायची आहे.राजेश पांडे, विश्वस्त, राष्ट्रीय पुस्तक न्यास