पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थी केंद्रस्थानी आहे. जगातील सर्वाधिक नवउद्यमी भारतात आहेत. आविष्कारसारख्या महोत्सवातून नव्या संशोधनाला चालना मिळेल. त्याद्वारे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होईल, असे मत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडले. तसेच यशस्वी संशोधन प्रकल्पांची उद्योग क्षेत्राशी सांगड घालून नवउद्यमींना सर्वोतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू असलेल्या आविष्कार या आंतरविद्यापीठीय संशोधन स्पर्धेला पाटील यांनी भेट दिली. तसेच विद्यार्थी संशोधकांशी संवाद सधला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा – महाराष्ट्रातील कुस्तीपटूंसाठी Good News ; राज्य सरकारने वाढवले मानधन, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा!

हेही वाचा – गृहमंत्र्यांनी केवळ बोलण्यापेक्षा कारवाई करावी, अजित पवार यांचा फडणवीसांना टोला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जी-२० परिषदेबाबत पाटील म्हणाले, भारताच्या नेतृत्वात जी-२० परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. जी-२० परिषदेच्या माध्यमातून आपले भविष्य घडवण्यासाठी संधी मिळाली आहे.