पुणे : देशात अनेक राजे, संस्थानिक होऊन गेले. मुघल, यादवांसह अनेक सत्ता होत्या. त्यांची राज्ये ही त्यांच्या कुटुंबाच्या नावाने इतिहासात नोंदली गेली. छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे वेगळे होते. ते कधीही भोसल्यांचे राज्य म्हणून ओळखले गेले नाही. ते नेहमीच रयतेचे राज्य राहिले, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त सह्याद्री प्रतिष्ठानने तयार केलेल्या ‘शिवराज्याभिषेक : भारताच्या इतिहासातील असामान्य घटना’ या ग्रंथाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. ग्रंथाचे मुख्य संपादक डॉ. सदानंद मोरे यांना शिवराज्यभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. खासदार श्रीनिवास पाटील, विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, प्रतिभा पवार, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे आणि सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल निवृत्ती पवार या वेळी उपस्थित होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhatrapati shivaji maharaj kingdom is of people kingdom statement by sharad pawar pune print news stj 05 ssb
First published on: 27-08-2023 at 21:02 IST