पुणे : भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा (जीएसडीए) आणि भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय) या सरकारी यंत्रणांनी केलेल्या सर्वेक्षणानंतर जिल्ह्यातील ७२ गावे धोकादायक म्हणजेच या गावांत दरड कोसळण्याचा धोका असल्याचे समोर आले होते. पीडब्ल्यूडीने त्यापैकी ४४ गावांत संरक्षणात्मक कामे, उपाययोजनांतर्गत करायच्या कामांचा अहवाल जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे पाठविला आहे. त्यानुसार
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निधीसाठी हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने विविध आपत्तींचा सामना करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी १५ व्या वित्त आयोगाद्वारे निधी मंजूर केला आहे. पुणे जिल्ह्यात माळीण दुर्घटनेनंतर (२०१४) २३ गावे धोकादायक असल्याचे समोर आले होते. त्यानंतर जीएसडीए आणि जीएसआय यांनी नव्याने केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील ७२ गावांना दरडींचा धोका असल्याचे समोर आले. जीएसआयच्या सर्वेक्षणानुसार पीडब्ल्यूडीने ४४ गावांत दरड प्रत्यक्ष पाहणी करून संरक्षक भिंत बांधणे, पाण्याचा प्रवाह काढणे, झाडे लावणे किंवा तात्पुरत्या स्थलांतरासाठी पर्यायी व्यवस्था उभारणे अशी ६८ कोटी १७ लाख सहा हजार रुपयांची अनेक कामे प्रस्तावित केली आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी हा अहवाल मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी दिली.
हेही वाचा >>>विनोद तावडे यांचे मोठे विधान… म्हणाले, “नो महाराष्ट्र, ओन्ली राष्ट्र”
तालुकानिहाय धोकादायक गावे
आंबेगाव : काळेवाडी एक-दोन, जांभळेवाडी, पांचाळे खु., भगतवाडी खु. , तळपेवाडी, सारवली, आवळेवाडी, आसाणे, कुसरे खु., अडिवरे, काळवाडी, आंबरे, कुसरे बु., पासरवाडी, बोरघर, मेघोली, दिगड, बेंडारवाडी, साकेरी, कोलतावडे, दरेवाडी
मावळ : मालेवाडी, सांगिसे, लोहगड, वाडेश्वर, वाउंड, ताजे, शिलाटणे, कलकराय, फलाने, वेहेरवाडी, बोरज, भुशी, कुसावली, मोरमारेवाडी
वेल्हे : टेकपोळे, आंबवणे, सिंगापूर, गर्जेवाडी, घोळ, गिवशी, मानगाव, धनगरवाडी, वाडघर, हरपुड
मुळशी : घुटके, गडले, विठठलवाडी, हिवाळेवस्ती, वाजरकरवाडी, साई, झाडाचीवाडी, कलमशेत
खेड : नायफड, शेंद्रेवाडी, गडाद, सोनारवाडी, शिरगाव, गडदवाडी
भोर : धानवली, डेहणे, सोनारवाडी, नानावळे, जांभळेवाडी
जुन्नर : भिवडे खु., भिवडे बु., सोनावळे, हातविज, गंगाळधरे