लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या एका अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या दुर्घटनेत ३ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्य सरकार स्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण. या घटनेत ३ जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना लवकर आराम पडावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. राज्य पोलीस दल, महामार्ग पोलीस, आयएनएस शिवाजी, अग्निशमन दल अशा सर्व यंत्रणा घटनास्थळी असून, आता आग आटोक्यात आली आहे. एका बाजूने वाहतूक पूर्ववत करण्यात आली असून, दुसराही मार्ग लवकरच सुरू होईल. राज्य सरकार स्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहे, असेही फडणवीस म्हणाले.