पिंपरी-चिंचवड उद्योगनरीत जलाभिषेकात गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे. सायंकाळी पाचनंतर सार्वजनिक गणेश मंडळे विसर्जन मार्गावर येण्यास सुरुवात झाली. गणरायाची दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर आज भावपूर्ण, भक्तीमय वातावरणात निरोप दिला जात आहे. ढोल, ताशाचे वादन, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा अखंड जयघोष…अशा जयघोषात मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. पारंपरिक तालवाद्यांच्या गजरात गणरायाला निरोप दिला जात आहे.

हेही वाचा >>> पुणे : एकीकडे विसर्जनाचा उत्साह, दुसरीकडे पावसाच्या पाण्याने वाहणारे रस्ते

Pune, Ganeshotsav, ganesh Utsav, pune ganesh Utsav, tradition, social harmony, festival preparations, police involvement
शहरबात : वार्ता उत्सवाची…
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
pune residents raise concerns over noise pollution in dahi handi festival
Dahi Handi Celebrations In Pune : नियमभंगाचेही थरावर थर!
devotees, Janmashtami, Shegaon, Buldhana,
बुलढाणा : शेगाव संस्थानात जन्माष्टमीला सनई चौघड्याचे सूर, भक्तांचा मेळा…
Bloody conflict in Amravati youth killed for revenge
अमरावतीत रक्‍तरंजित संघर्ष, सूड उगवण्‍यासाठी युवकाची हत्‍या
seven star mitra mandal case marathi news
उल्हासनगरमध्ये गणपती आगमन मिरवणुकीची परवानगी न घेणाऱ्या गणेशोत्सव मंडळावर गुन्हा
Donation of 30 kg of silver by young entrepreneur of Nanded sumit mogre to Shri Ganesha Temple in Dombivli
डोंबिवलीतील श्री गणेश मंदिराला नांदेडच्या युवा उद्योजकाकडून ३० किलो चांदीचे दान
Gajanan Maharajs palanquin arrived in Khamgaon on Saturday
श्रावणधारात वारकरी, हजारो भाविक चिंब! ‘श्रीं’ची पालखी खामगावात…

प्रमुख मंडळे विसर्जन मार्गावर येण्यास सुरुवात झाली आहे. चिंचवडगाव येथील गांधीपेठ तालीम मित्र मंडळाची मिरवणूक सायंकाळी सात वाजता सुरू होणार आहे. चापेकर चौकातील नवतरुण मंडळाची विसर्जन मिरवणूक सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सुरू होईल. आकुर्डी येथील नवतरुण मित्र मंडळाची मिरवणूक संध्याकाळी साडेसहा वाजता सुरु होणार आहे. दरम्यान, सकाळी घरगुती गणपतीला निरोप देण्यात आला. नदीघाट, कृत्रिम तलाव आणि फिरते विसर्जन केंद्र या ठिकाणी लोकांनी मोठ्या प्रमाणात गणरायाला निरोप देण्यासाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.