पुणे: यंदाच्या देशाच्या कोणत्या ना कोणात्या भागाला सतत नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला. अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा, भूस्खलन आदी आपत्तींमुळे २,९२३ जणांना आपला जीव गमवावा लागला. १८.४ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. ९२,५१९ जनावरांचा मृत्यू झाला आणि ८० हजार ५६३ घरांचे नुकसान झाले. २०२३ मध्ये देशाला नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला.

सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्वरायमेंटने (सीएसई) केलेल्या सर्व्हेक्षणात नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला आहे. सीएसईने दिलेल्या माहितीनुसार, यंदा एल-निनोमुळे उशिराने मोसमी पाऊस सक्रीय होणे, अतिवृष्टी, पूर, गारपीट, भूस्खलन आदी नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला. या नैसर्गिक आपत्तींमुळे वर्षभरात देशात २,९२३ जणांचा मृत्यू झाला आहे. पूर, अतिवृष्टीमुळे, पाण्याच्या वेगवान प्रवाहांमुळे देशातील १८.४ हेक्टर सुपीक जमिनीचे आणि पिकांचे नुकसान झाले आहे. पूर, दुष्काळी स्थिती आणि भूस्खलनामुळे ९२, ५१९ जनावरांचा मृत्यू झाला आहे, तर देशभरात ८०,५६३ घरांचे नुकसान झाले आहे.

Tirgrahi Yog In Mesh
१०० वर्षांनंतर सूर्य, शुक्र आणि गुरूची होणार युती! त्रिग्रही योगामुळे या राशीच्या लोकांच्या आयुष्यात होईल आनंदी आनंद
What was the cause of the Rwandan genocide 30 years ago
१०० दिवसांत ८ लाखांची कत्तल…३० वर्षांपूर्वीच्या रवांडा नरसंहाराचे कारण काय होते? सद्यःस्थिती काय?
budh planet will make neechbhang rajyog these zodiac sign could be lucky
बुध ग्रहामुळे ५० वर्षांनंतर तयार होणार ‘नीचभंग राजयोग’; ‘या’ ३ राशींच्या लोकांना अचानक होऊ शकतो धनलाभ
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?

हेही वाचा… नामदेव शास्त्री म्हणाले, ‘कोणताही देव मोठा नसतो,तर…’

नैसर्गिक आपत्तींचा सर्वांधिक फटका मध्य प्रदेशला बसला. बिहारमध्ये सर्वांत जास्त जिवितहानी झाली. जून ते सप्टेंबर या काळात बिहारमध्ये ६४२ जणांचा मृत्यू झाला आहे. याच काळात हिमाचल प्रदेशात ३६५ तर उत्तर प्रदेशात ३४१ जणांचा मृत्यू झाला आहे. या नैसर्गिक आपत्तींचा सर्वाधिक फटका गरीब, शेतकरी वर्गाला बसला आहे.

जगाने सामना केला २० मोठ्या आपत्तींचा

ख्रिश्चयन एड, या संस्थेने काउंटिंग द कॉस्ट २०२३ : ए ईयर ऑफ क्लाइमेट ब्रेकडाउन, या नावाने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात २०२३मध्ये जगाला २० सर्वांत मोठ्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला. अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, वादळे आणि जंगलांना लागलेल्या आगींचा १४ देशांना सर्वाधिक फटका बसला. त्यात अमेरिकेतील हवाईमधील जंगलांना लागलेली आग, गुआम, वानुअतु, न्यूझीलंडमध्ये आलेली वादळे, न्यूझीलंड, इटली, लिबिया, पेरु, चिली आणि हैती आदी देशात आलेला महापूर आणि स्पेनमधील दुष्काळ आदींचा समावेश आहे.