पुणे : सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सुटावेत, त्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे आणि त्यांच्या नव्या कल्पनांना विकासकामांमध्ये स्थान मिळावे, या उद्देशाने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सुरू केलेल्या खासदार जनसंपर्क सेवा अभियानाचा दुसरा टप्पा सध्या सुरू असून, या दुसऱ्या टप्प्यातील दुसरे अभियान रविवारी कसबा विधानसभा मतदारसंघात झाले.

कसबा विधानसभा मतदारसंघात झालेला हा दुसरा आणि एकूण सलग आठवा जनता दरबार होता. भर पावसातही या अभियानाला नागरिकांनी प्रतिसाद दिला. नागरिकांनी वैयक्तिक प्रश्न, सोसायट्यांचे विषय, नागरी समस्या आणि विकासकामांसंदर्भात नव्या कल्पना याबाबत केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांची भेट घेतली. या प्रश्नांच्या सोडवणुकीसंदर्भात संबंधित विभागांना तत्काळ सूचित केले असून, येत्या काही दिवसांतच हे विषय निश्चितच मार्गी लागतील, असा विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला.

शहराचा खासदार या नात्याने मोहोळ यांच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने खासदार जनसंपर्क सेवा अभियान अर्थात विधानसभा मतदारसंघनिहाय जनता दरबार आयोजित केला जात आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात रविवारी झालेला जनता दरबार हा सलग आठवा जनता दरबार असून, पहिल्या सात जनता दरबारातील नागरिकांचे प्रश्न मार्गी लागले आहेत. कसब्याचे आमदार हेमंत रासने, शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर तसेच कसबा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभियानादरम्यान मोदी सरकार आणि महायुती सरकारच्या विविध योजना समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी योजनांचे स्टॉल्स विभागवार उपलब्ध करून देण्यात आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भर पावसातही ‘कसबा’वासीयांनी या अभियानाला मोठा प्रतिसाद दिला. वैयक्तिक प्रश्नांसह नागरिकांनी सार्वजनिक प्रश्न, सोसायट्याचे विषय आणि अपेक्षित विकासकामे याबाबत चर्चा केली. एक लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे समाधान निश्चितच मिळत आहे. – मुरलीधर मोहोळ, केंद्रीय सहकार राज्यमंत्री