लोणावळ्यातून बेपत्ता झालेल्या दोन शाळकरी मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले. ग्रामीण पोलीस तसेच उस्मानाबाद पोलिसांच्या पथकाने ही कामागिरी केली. रेल्वेने उस्मानाबादकडे जात असलेल्या मुलींना ताब्यात घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले.लोणावला ग्रामीण परिसरातील कुसगाव येथून दोन शाळकरी मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक निलेश माने आणि पथकाने तातडीने तपास सुरू केला.

हेही वाचा >>> पुणे : विवाहाच्या आमिषाने डॅाक्टर तरुणीची फसवणूक ; फसवणूक प्रकरणी डॅाक्टरच्या विरोधात गुन्हा

सीसीटीव्ही चित्रीकरणात पुणे रेल्वे स्थानक परिसरात पनवेल-नांदेड या गाडीतून मुली प्रवास करत असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी या घटनेची माहिती उस्मानाबाद पोलीस दलातील अतिरिक्त पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांना कळविली. उस्मानाबाद रेल्वे स्थानक परिसरात पनवेल- नांदेड रेल्वे गाडी थांबली. पोलिसांच्या पथकाने मुलींना ताब्यात घेऊन चौकशी केली. मुली सुखरुप असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ, घुगे, जय पवार उस्मानाबादला रवाना झाले. पोलिसांनी मुलींना ताब्यात घेतले.

हेही वाचा >>> पुणे : आवक कमी झाल्याने टोमॅटो,फ्लॅावर, शेवग्याच्या दरात वाढ ; घेवडा, वांगी स्वस्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॅा. अभिनव देशमुख, अतिरिक्त अधीक्षक मितेश घट्टे, लोणावळा उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब ढोले तसेच अतिरिक्त अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सीताराम डुबल, सहायक निरीक्षक निलेश माने, सचिन राऊळ आदींनी ही कारवाई केली.