चिंचवड विधानसभेच्या नवनिर्वाचित महिला आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी बिनविरोध निवडणुकीवर परखड मत व्यक्त केले आहे. विद्यमान आमदाराचे निधन झाल्यास तिथं निवडणूक न लढवीता ती जागा बिनविरोध द्यायला हवी. उगाच निवडणूक लढवून त्या कुटुंबावर ओरखडे ओढणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. अश्विनी लक्ष्मण जगताप यांचा आज आमदारकीचा पहिला दिवस होता. त्यांनी मतदार संघातील पिंपळे गुरव येथे असलेल्या कार्यालयात येऊन कामकाज पाहण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.

हेही वाचा- कसब्याची पुनरावृत्ती कोथरूडमध्ये?

Pune Lok Sabha, Ravindra Dhangekar,
पुणे लोकसभा : पराभवाच्या भीतीपोटी रविंद्र धंगेकर हे आरोप करीत आहे – भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर
Rohini Khadse Raksha Khadse
रोहिणी खडसे भाजपात जाणार?, रक्षा खडसेंच्या आवाहनावर प्रतिक्रिया देत म्हणाल्या…
Ashok Chavan, Congress
अशोक चव्हाण म्हणतात, “काँग्रेसमधून मी बाहेर पडल्याने फरक…”
Manoj Jarange Patil reacts on who will get support by maratha community in Lok Sabha elections
लोकसभा निवडणुकीबाबत मराठा समाज कोणाच्या बाजूने? मनोज जरांगे पाटील म्हणाले, “उमेदवार होण्यापेक्षा पाडणारे व्हा…”

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत विजयी झालेल्या आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी पहिल्याच दिवशी कामकाज करण्यास प्राधान्य दिले. ३६ हजारापेक्षा अधिक मताधिक्याने विजयी झाल्यानंतर त्यांनी आज पहिल्याच दिवशी मतदारसंघातील प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, आमदार म्हणून साहेबांनी (दिवंगत लक्ष्मण जगताप) जशी सुरुवात करायचे तशीच सुरुवात आज माझी झाली आहे. ते लवकर उठून कार्यालयात यायचे. इथं आलेले नागरिक पाहून मला आनंद होतो आहे. साहेबांच्या खुर्चीवर बसले आहे. त्यामुळं अधिक जबाबदारी वाढली आहे. मताच्या रूपाने मला मतदारांनी मोठा पाठिंबा दिला आहे. शास्तीकर आणि अनधिकृत बांधकाम हा प्रश्न मार्गी लावायचा आहे. इथपर्यंत येईल असं मी स्वप्नात ही पाहिलं नव्हतं. साहेबांच्या निधनामुळे आणि नागरिकांच्या आग्रहवास्तव मी निवडणूक लढवण्याच ठरवलं असं अश्विनी जगताप म्हणाल्या.

हेही वाचा- “जनतेच्या मनातील आमदार मीच” म्हणणाऱ्या बंडखोर राहुल कलाटेंचे डिपॉझिट जप्त!

बिनविरोध पोटनिवडणूक व्हायला हवी का? या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले. त्या म्हणाल्या की, अशा घटना घडल्यास तिथं बिनविरोध निवडणूक व्हायला हवी. त्या कुटुंबावर, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांवर दुःखाचा डोंगर असतो. निवडणूक लढवून ओरखडा ओढणे फार चुकीचे आहे. कुणाच्या ही घरात अस झालं तर तिथं निवडणूक ही बिनविरोध व्हावी, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे.