पुणे : उद्धव ठाकरे यांच्या सत्ताकाळात राज्यात मोदी सरकारच्या १८ योजना बंद पाडल्या. महाराष्ट्राची अडीच वर्षे बरबाद केली. महाराष्ट्रात जे काही राजकारण चालले आता त्या बाबत बोलले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशीरापर्यंत काम करून न्यायालयात टिकणारे आरक्षण मराठा समाजाला दिले होते. पण उद्धव ठाकरे ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकवू शकले नाहीत. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरे आहेत, असा घणाघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश महाअधिवेशनात बावनकुळे बोलत होते. आज सामाजिक आंदोलनाच्या नावाखाली देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले जात आहे. ओबीसींचे गेलेले आरक्षण देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी परत आणले. पंचायतीच्या निवडणुका महाविकास आघाडीमुळे रोखल्या गेल्या, असेही बावनकुळे बोलत होते.

हेही वाचा : भाजपचे महाराष्ट्र प्रदेश महाअधिवेशन पुण्यात सुरू, अमित शहा यांची उपस्थिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पूर्वीचे प्रदेश महाअधिवेशन २०१३ मध्ये देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष असताना झाले होते. त्यानंतर राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार आले होते. लोकसभा निवडणुकीत मोठी ताकद लावली. विरोधकांच्या राजकारणामुळे जागा कमी झाल्या. पण जनाधार वाढला आहे. नऊ जागा जिंकल्या, १० जागा हरल्या. धुळे, बीड, अमरावती, नगर, उत्तर मुंबई, भंडारा, गोंदिया, भिवंडी अशा जागांवर प्रत्येक बूथवर २५ मते मिळाली असती, तर १९ जागा निवडून आल्या असत्या. निवडणुकीत खूप खोट्या गोष्टींना सामोरे जावे लागले. मोदींचे सरकार आल्यास आरक्षण जाईल, घटना बदलली जाईल असा प्रचार विरोधकांनी केला, तो प्रचार खोडून काढता आला नाही, असे बावनकुळे यांनी सांगितले.