पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात सुरू असलेल्या पावसाचा जोर रविवारी काहीसा कमी झाला. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीत सुरू असलेला पाण्याचा विसर्ग १८ हजार क्युसेकवरून १४ हजार ८०१ करण्यात आला. खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही तिन्ही धरणे १०० टक्के भरली असून केवळ टेमघर धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची प्रतिक्षा आहे.

 सध्या चारही धरणांमधील पाणीसाठा ९८ टक्क्यांवर पोहोचला आहे. शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत टेमघर धरण क्षेत्रात ५५ मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात ४२ मि.मी, पानशेत धरण परिसरात ४५ मि.मी, तर खडकवासला धरण क्षेत्रात पाच मि.मी. पाऊस पडला. खडकवासला धरणातून मुठा नदीत रात्री दहा वाजल्यापासून १८ हजार ४९१ क्युसेकने पाणी सोडण्यात आले. मात्र, रविवारी सकाळपर्यंत चारही धरणांच्या परिसरात पावसाचा जोर काहीसा कमी झाला. त्यामुळे हा विसर्ग १४ हजार ८०१ क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला आहे, असे खडकवासला धरण साखळी प्रकल्पाचे सहायक अभियंता यो.स.भंडलकर यांनी सांगितले.

Yavatmal Washim Lok Sabha Constituency, Fears of declining Low Voting, Wedding Season, Rising Temperatures, yavatmal news, washim news, lok sabha 2024, election 2024, marathi news,
वाढते तापमान, लग्नसराई, अवकाळीमुळे मतदानात घट होण्याची भीती; राजकीय पक्षांसमोर टक्का वाढविण्याचे आव्हान
increase in the number of floodplains Water pumping pumps at 481 places during monsoon
जलमय सखल भागांच्या संख्येत वाढ? पावसाळ्यात ४८१ ठिकाणी पाणीउपसा पंप; खर्चातही वाढ
mumbai, registered vehicle number, RTO, traffic jam, vehicular pollution
मुंबईत वाहतूक कोंडी, प्रदूषणाचे संकट; वर्षभरात अडीच लाख वाहनांची नोंदणी; एकूण वाहने ४६ लाखांवर
Water reserves in the country at 35 percent Where is the worst situation
देशातील पाणीसाठा ३५ टक्क्यांवर… कुठे आहे सर्वाधिक बिकट स्थिती?

प्रमुख धरणांमधील पाणीसाठा टीएमसी, टक्क्यांत –

टेमघर                   ३.२८      ८८.४८
वरसगाव               १२.८२    १००
पानशेत                 १०.६५    १००
खडकवासला        १.९७      १००
एकूण                   २८.७२   ९८.५३

धरणांना तिरंगी विद्युत रोषणाई –

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या तीन धरणांना तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सध्या या तिन्ही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी अनेक नागरिक धरण परिसरात गर्दी करत आहेत.