पुणे : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर देशभरातून भाविक तेथे दर्शनासाठी येऊ लागले आहेत. भाविकांच्या सोयीसाठी देशभरातून रेल्वेने दोनशे आस्था विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. पुण्यातून अयोध्येसाठी १५ विशेष गाड्या ३० जानेवारीपासून सोडल्या जाणार आहेत. परंतु, अयोध्येतील गर्दीमुळे या गाड्यांचे वेळापत्रक पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आस्था गाड्यांचे सर्व डबे शयनयान श्रेणीचे असतील. प्रत्येक गाडीत सुमारे दीड हजार प्रवासी असणार आहेत. इंडियन रेल्वे केटरिंग टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) या गाड्या सोडणार आहे. या गाड्यांसाठी एकट्या प्रवाशाला तिकीट आरक्षित करता येणार नाही. प्रवाशांचा समूह असेल तरच तिकिट आरक्षित करता येईल. यासाठी किमान १५ प्रवाशांचा समूह आवश्यक आहे. या गाड्या ३० जानेवारी ते ३ मार्च या कालावधीत सोडण्याचे नियोजन असून, एकूण १५ गाड्या सोडल्या जाणार असून, त्या दर दोन दिवसांनी सोडल्या जातील.

Navi Mumbai, OLX, scam, washing machine, fraud, bank information, QR code, Rabale Police Station, navi Mumbai news,
नवी मुंबई: कपडे धुण्याच्या मशीन खरेदीत २ लाख ७ हजार रुपयांची फसवणूक 
water supply, Karad, pipe, bridge,
सातारा : कराडला पाणीपुरवठ्यासाठी जुन्या पुलावरून जलवाहिनी
Central Railway has completed the work of erecting the girder of the Karnak Port flyover Mumbai
कर्नाक बंदर उड्डाणपुलाचे गर्डर उभारले
Mumbai 66 lakh fraud marathi news
६६ लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पुण्यातून अटक
Kalyan railway station, water,
पावसाचे पाणी उपसण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानक भागात पाणी उपशाचे तीन पंप
strict law to control bogus pathology labs says minister uday samant
बोगस पॅथोलॉजी लॅबवर नियंत्रणासाठी कठोर कायदा – सामंत
bear, Dighori mothi police station,
तक्रार करण्यासाठी अस्वल जेव्हा पोलीस ठाण्यात येते तेव्हा! पोलीस कर्मचाऱ्यांची बोबडी वळली, एकच पळापळ…
Excavation of Wadala to Paral water tunnel completed by Mumbai Municipal Corporation
मुंबई महानगरपालिकेतर्फे जलबोगद्यांचा विक्रम… न्यूयॉर्कपाठोपाठ सर्वांत मोठे जाळे… पण यातून पाणी प्रश्न सुटणार का?

आणखी वाचा-पंतप्रधानांचा परीक्षा पे चर्चा कार्यक्रम दाखवण्याची व्यवस्था करा, शिक्षण विभागाचा आदेश

देशभरातून अयोध्येसाठी आस्था विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन आहे. परंतु, अयोध्येतील गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या गाड्यांचे वेळापत्रक काही दिवस पुढे ढकलण्याचे रेल्वेचे नियोजन आहे. कारण या गाड्यांतून देशभरातील भाविक अयोध्येत पोहोचून गर्दी आणखी वाढणार आहे. यासाठी रेल्वेने या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गाड्यांमध्ये केवळ शाकाहारी जेवण

आस्था या गाड्यांमध्ये केवळ शाकाहारी जेवण दिले जाणार आहे. या गाड्यांच्या तिकिटावर आरक्षण शुल्क, सुपरफास्ट गाडी शुल्क, खानपान शुल्क, सेवा शुल्क आणि वस्तू व सेवा कर लावला जाणार आहे. याचबरोबर कोल्हापूर ते अयोध्या गाड्या सोडण्याचाही रेल्वे प्रशासनाचा विचार आहे. पुण्यासह मुंबई, नागपूर, वर्धा, जालना येथूनही आस्था गाड्या सोडल्या जाणार आहेत.