अरविंद वैद्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र आणि मराठी भाषेवर एक फार मोठं संकट येऊ घातलं आहे. सध्याच्या झंझावाती राजकारणात महाराष्ट्र आणि मराठी भाषा यांचा निभाव लागायचा असेल तर फार मोठा संघर्ष करावा लागणार आहे. दुर्दैवाने असा संघर्ष करण्याची कुवत सध्या कोणत्याही राजकीय पक्षात किंवा नेत्यात दिसत नाही. महाराष्ट्र आणि मराठी भाषा यांच्यावर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मुंबई हा राज्याच्या स्थापनेपासूनच एक वादग्रस्त विषय राहिलेला आहे. ‘मुंबई महाराष्ट्रापासून तोडू देणार नाही…’ अशी राणा भीमदेवी घोषणा काही राजकीय पक्ष आणि नेते त्यांच्या अस्तित्वासाठी करत असतात. पण आता वेळ अशी आलेली आहे की, मुंबई महाराष्ट्रापासून भौगोलिक आणि राजकीय दृष्टीने न तोडतासुध्दा महाराष्ट्रापासून अलग होऊ शकते. यासाठी येती मुंबई म.न.पा. आणि २०२४ ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कसोटीची आणि अतिशय निर्णायक ठरणार आहेत. सध्याची महाराष्ट्रातील एकूण राजकीय परिस्थिती पाहता भाजपचं झंझावाती राजकारण प्रभावी ठरणार आणि दोन्ही ठिकाणी भाजपला निर्विवाद बहुमत मिळणार यात शंका नाही. हेच महाराष्ट्राच्या आणि मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी घातक ठरणार आहे. आज महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय पक्ष किंवा नेत्यामध्ये प्रादेशिक अस्मिता दिसून येत नाही. याचाच फायदा भाजपला मिळू शकतो. मुंबईचं मराठीकरण करायचं सोडून ते महाराष्ट्राचंच हिंदीकरण करतील.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Are we aware of the impending threat to maharashtra identity dvr
First published on: 16-12-2023 at 09:45 IST