श्रीकांत पटवर्धन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान मोदी यांनी गेल्या दोन वर्षांत बऱ्याच वेळा आपल्या राज्य घटनेतील ‘मूलभूत कर्तव्ये’ (अनुच्छेद ५१क ) या भागाकडे लक्ष वेधले आहे. प्रस्तावित नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात निदर्शने करताना सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या निदर्शकांना त्यांनी – ‘नागरिकत्वाचे हक्क आणि कर्तव्ये या एकाच नाण्याच्या दोन बाजू’ असल्याची जाणीव करून दिली. महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंती समारंभाच्या आयोजकांच्या बैठकीतही त्यांनी नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचे स्मरण करून दिले. लोकांनी आपली देशाप्रति असलेली कर्तव्ये जर नीटपणे पार पाडली, तर आपोआपच इतरांचे हक्क कसे जपले जातात, यावर गांधीजी भर देत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. खरेतर त्यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर लगेचच एक महत्त्वाचा धोरणात्मक बदल म्हणून यापुढे ‘मूलभूत हक्कांपेक्षा मूलभूत कर्तव्यांवर अधिक भर’ दिला जाणार असल्याचे सूचित केले होते. ‘आझादी का अमृत महोत्सव’विषयी २० जानेवारी २०२२ रोजी झालेल्या संबोधनातही त्यांनी मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख केला होता.

मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime minister modi panchaprana or article 51 c of the constitution of india asj
First published on: 18-08-2022 at 09:35 IST