ज्येष्ठ कवी तुळशीराम माधवराव काजे यांचे पोळ्याच्या दिवशी निधन झाले. दोन वर्षांपूर्वी वऱ्हाडी भाषेची श्रीमंती देशभर पसरवणारे कवी शंकर बडे याच दिवशी निवर्तले. हा एक योगायोग, पण  विदर्भावर, इथल्या मातीवर प्रेम करणाऱ्या या दोन्ही प्रतिभावान कवींचे कृषी संस्कृतीवरील प्रेम बावनकशी होते.

तुळशीराम काजे यांची प्रेमजाणिवा आणि निसर्गानुभूती व्यक्त करू पाहणारी सुरुवातीची कविता नंतरच्या काळात समाजजीवनातील विसंगती, दांभिक व्यक्तिजीवन, शोषणव्यवस्था व सामान्य माणसाची परवड इत्यादी अंगांनी अभिव्यक्त होत गेली. काजे यांचे मूळ गाव अमरावती जिल्ह्यातील पुसनेर. त्यांचे बालपण याच खेडेगावात मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात गेले. तेथे तिसरीनंतर शिक्षणाची सोय गावात नसल्यामुळे चौथीच्या शाळेसाठी त्यांना गावापासून दोन मैल अंतरावर असणाऱ्या नांदसावंगी येथे पायी जावे लागत असे. पुढील शिक्षणासाठी त्यांना अमरावतीला यावे लागले. एम.ए., बी.एड. झालेल्या तुळशीराम काजे यांनी १९६० मध्ये शिक्षक म्हणून नोकरी पत्करली. त्याआधीपासून ते काव्यलेखन करीत होते. ‘नभ अंकुरले’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह १९५८ साली प्रकाशित झाला होता. ‘ठेविले अनंते तैसेची राहावे, रक्त शोषू द्यावे शांतपणे, अधम सत्तेचे पाऊल चाटावे, चित्ती असो द्यावे समाधान!’, अशा ओळींनी वास्तवावर भाष्य करणारे काजे यांचा मौज प्रकाशनने १९८३ साली प्रकाशित केलेला ‘भ्रमिष्टांचे शोकगीत’ हा दुसरा काव्यसंग्रह प्रचंड गाजला. महाराष्ट्र शासनाच्या केशवसुत पुरस्काराने त्यांना त्यासाठी सन्मानित करण्यात आले होते. ‘काहूर भरवी’ हा त्यांचा तिसरा काव्यसंग्रह. ‘धारा’ या त्रमासिकाचे संपादनही त्यांनी केले होते. वरुड तालुक्यातील लोणी येथील रामप्यारीबाई चांडक विद्यालयात माध्यमिक शिक्षक म्हणून प्रदीर्घ सेवा देऊन ते १९९२ मध्ये निवृत्त झाले. अमरावती विद्यापीठाच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे तज्ज्ञ सदस्यपद, वरुड येथे २००२ मध्ये झालेल्या सातव्या मराठी जनसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.  वर्षभरापूर्वी त्यांना सूर्यकांतादेवी पोटे स्मृती साहित्यव्रती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तुळशीराम काजे हे संकोची स्वभावाचे. फारसे गर्दीत मिसळणारे नव्हते. पण, त्यांच्या कवितांमधून समाजजीवनातील दांभिकपणा, विसंगती यावर कठोर प्रहार होत गेले. त्यांची कविता ही मातीशी नाळ जोडणारी होती. मानवी प्रवाही जीवनात निव्र्याजपणे जगण्याचे मोल त्यांच्या कवितेतून व्यक्त होत राहिले. त्यांच्या कवितांमधून आत्मभान आणि समाजभान यांचा सुरेख मेळ साधला गेला, म्हणून त्यांच्या कविता रसिकांच्या मनाला भिडल्या.

crack at the base of statue of chhatrapati sambhaji maharaj viral on social media clarification given pcmc chief
छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायाला भेग? महापालिका आयुक्त म्हणतात…
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
These four zodic sign dear of Shri Krishna
आकस्मिक धनलाभ होणार; श्रीकृष्णाच्या ‘या’ चार प्रिय राशींना मिळणार धन-संपत्ती आणि ऐश्वर्याचे सुख
26th August Panchang & Marathi Rashi Bhavishya
कृष्ण जन्माष्टमी, २६ ऑगस्ट पंचांग: कृष्णाच्या कृपेने ‘या’ ५ राशींचा दिवस शुभ-फलदायी ठरेल; नात्यात वाढेल प्रेम तर नोकरी, व्यवसायात मिळेल यश; वाचा तुमचं भविष्य
Kolhapur Girl assaulted and Killed
Kolhapur Girl Abuse and Murder: कोल्हापूर हादरलं! १० वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस माहिती देताना म्हणाले, “काल रात्री…”
After the death of the young son the father also passed away
रत्नागिरी : तरुण मुलाच्या मृत्यूनंतर वडिलांनीही सोडले प्राण
Kalyan, Shivajirao Jondhale, Late Shivajirao Jondhale, liver cancer, Geeta Khare,
वैद्यकीय उपचारांच्या हलगर्जीपणातून डोंबिवलीतील शिवाजीराव जोंधळे यांचा मृत्यू, गिता खरे यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल
shivpratap roro ferry service begin in shivsagar reservoir by satara district council
शिवसागर जलाशयात शिवप्रताप तराफा दाखल; कोयनेतील दळणवळण होणार सोयीचे; संभाजी शिंदेंच्या हस्ते पूजन