जिल्ह्य़ात मंगळवारी ६९३ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ातील करोनाबाधितांची एकूण संख्या २ लाख ८ हजार २८५ इतकी झाली आहे. तर, दिवसभरात २१ जणांचा मृत्यू झाला असून जिल्ह्य़ातील मृतांची एकूण संख्या ५ हजार २६१ वर पोहोचली आहे.

जिल्ह्य़ात मंगळवारी आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये ठाणे शहरातील १८९, कल्याण-डोंबिवलीतील १३०, मीरा-भाईंदरमधील १२९, नवी मुंबईतील १२१, ठाणे ग्रामीणमधील ३२, बदलापूर शहरातील ३१, उल्हासनगर शहरातील ३०, अंबरनाथ शहरातील १६ आणि भिवंडी शहरातील १५ रुग्णांचा समावेश आहे.

मंगळवारी जिल्ह्य़ात २१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ठाणे ग्रामीणमधील ५, ठाणे शहरातील ४, कल्याण-डोंबिवलीतील ३, नवी मुंबईतील ३, मीरा-भाईंदरमधील २ तर उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी शहरातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.