जिल्ह्यत शुक्रवारी १ हजार ६७१ नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६७ हजार १४ वर पोहोचली आहे.  दिवसभरात ३२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने जिल्ह्यतील मृतांचा आकडा ४ हजार ३०२ झाला आहे. शुक्रवारी आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये ठाणे शहरातील ४२९, नवी मुंबईतील ३९७, कल्याण-डोंबिवली शहरातील ३३८,  मीरा-भाईंदरमधील १८६, ठाणे ग्रामीणमधील १७२, बदलापूरमधील ४८, अंबरनाथमधील ४८, भिवंडी शहरातील २९ आणि उल्हासनगर शहरातील २४ रुग्णांचा समावेश आहे.