ठाणे : गेले काही दिवस राज्यात ठिकठिकाणी होत असलेल्या वळीवाच्या पावसाचा परिणाम भाज्यांवर होऊ लागला आहे. भाज्यांच्या मोठे नुकसान झाल्यामुळे बाजारात आवक घटली आहे. परिणामी, घाऊक आणि किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात वाढ झाली. भेंडी, दुधी भोपळा, चवळी शेंग, फरसबी, कारले, वांगी आणि शिमला मिरचीचे दर किरकोळ बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत दहा ते वीस रुपयांनी वाढले आहेत. यंदा वळीव पावसाचा भाजी उत्पादनाला फटका बसला. वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत पुणे आणि नाशिक जिल्ह्यात पिकवलेल्या भाज्यांची मोठी आवक होते. राज्यातील विविध भागांत झालेल्या वळीव पावसामुळे भाज्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे आवक घटली आहे.

हेही वाचा : भाजप सत्तेत आल्यास मतदानाचा अधिकार संकटात – शरद पवार

It is feared that most of the villages will be affected by the development projects in Thane district even during the rainy season
ठाणे जिल्ह्यात ‘समृद्धी’ने पुराची अवकळा
Pune, water storage, state dams, heavy rains, 10.38%, 148.71 TMC, 47.30%, Konkan division, Pune division, Nashik division, Marathwada division, Amravati division, Nagpur division,
राज्यातील धरणांमधील पाणीसाठा ६७६ टीएमसी, गेल्या पाच दिवसांत १४८ टीएमसीने वाढ
heavy rain, thane district, Barvi Dam, storage, 60 percentage
बारवी धरण ६० टक्के भरले, २४ तासांत ६ टक्क्यांची वाढ
urad, soybean, Solapur, rain, Kharif,
सोलापूर : पोषक पाऊसमानामुळे दोन लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रात उडीद व सोयाबीनचा पेरा, १७० टक्क्यांवर खरीप पेरण्या
Farmer Suicides in Maharashtra, Farmer Suicides in Maharashtra Surge to 1267, Government Welfare Schemes, farmer suicides, Maharashtra, welfare schemes, Amravati, Chhatrapati Sambhajinagar, Relief and Rehabilitation Department, Pradhan Mantri Shetkari Samman Yojana, Namo Farmers Yojana,
दिवसाला सहा शेतकरी आत्महत्या, सहा महिन्यांत १२६७ शेतकऱ्यांनी जीवन संपवले
Increase in water level of dams in the maharashtra state pune
राज्यातील धरणांच्या पाणीपातळीत वाढ; आठ दिवसांत ६८ टीएमसी पाणीसाठा
8 Zika patients found in maharashtra in two months
राज्यात दोन महिन्यांत सापडले झिकाचे आठ रुग्ण; वैद्यकीय अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
significant Water Levels increase in Raigad Dams, Water Levels in Raigad Dams, Heavy Rainfall in raigad, marathi news, raigad news, alibaug news,
रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीत वाढ, पावसाचा जोर वाढल्याने धरणात ४२ टक्के पाणीसाठा

वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत आठड्याभरापूर्वी दिवसाला १२० ते १५० गाड्या दाखल होत होत्या. गुरुवारपासून त्यात घट झाली. सध्या दिवसाला ९० ते ११० भाजीच्या गाड्या दाखल होत असल्याचे वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीतील सूत्रांनी सांगितले. परिणामी, मुंबई तसेच उपनगरातील बाजारपेठेत भाज्यांची आवक घटली असून त्यांच्या दरात वाढ झाली. किरकोळ बाजारात भेंडी, दुधी भोपळा, चवळी शेंग, कारले, वांगी , शिमला मिरची या भाज्या प्रति किलो ६० ते ८० रुपयाने विकल्या जात आहेत. तर, फरसबीने किरकोळ बाजारात शंभरी पार केल्याचे ‘एपीएमसी’तील भाजी बाजाराचे उपसचिव मारुती पबितवार यांनी सांगितले.

भाज्याआठवड्याभरापूर्वी (घाऊक किरकोळ)सध्या (घाऊक किरकोळ)
भेंडी३८ ६०४५ ८०
दुधीभोपळा२२ ६०२५ ८०
चवळी शेंग३० ६०४० ८०
फरसबी९० १००-१२०१०० १८०-२००
कारले४२ ५०४५ ६०
वांगी२४ ४०३४ ६०
शिमला मिरची३५ ६०४५ ८०