ठाणे: गेल्या दोन ते तीन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाल्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याने ठाणे, मुंबई आणि उपनगरांमध्ये भाज्यांची आवक घटली असून यामुळे घाऊक बाजारात भाज्यांच्या दरात प्रति किलोमागे पाच ते दहा रुपयांनी वाढ झाली आहे. तर, किरकोळ बाजारात ग्राहकांकडून अव्वाचे सव्वा दर आकारुन ग्राहकांची लुट केली जात आहे. शिवाय, टोमॅटो आणि कांदा सत्तरी पार गेले आहेत. या दर वाढीमुळे नागरिकांना महागाईची झळ बसू लागली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळे नाशिक, नगर तसेच इतर जिल्ह्यातील शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे मुंबई, ठाणे उपनगरात भाज्यांची आवक घटली आहे. वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत ५ ते १० टक्क्यांनी आवक घटली आहे. दोन दिवसापूर्वी बाजार समितीत भाज्यांच्या ५५० ते ६०० गाड्या दाखल झाल्या होत्या. तर, मंगळवारी या गाड्यांच्या संख्येत घट झाली असून ४५० ते ५०० गाड्याच दाखल झाल्याची माहिती वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. आवक घटल्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.

IVF, infertility, artificial insemination, Aditya Birla Memorial Hospital, Oasis Fertility, World IVF Day, technology advancements, success rate, assisted hatching, embryoscope, gametes activation, microfluids, pre genetic testing, pune news, latest news, loksatta news,
कृत्रिम गर्भधारणेकडे वाढतोय ओढा, बदलत्या जीवनशैलीमुळे वंध्यत्वाच्या समस्येत वाढ; जोडप्यांची आयव्हीएफला पसंती
fishing uran marathi news
दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर दर्यात जाण्यास नाखवा सज्ज
aloja Central Jail, Taloja Central Jail Implements AI Powered Surveillance, CCTV Cameras in Taloja central jail, Security and Transparency, Taloja news, panvel news,
तळोजा कारागृहातील कैद्यांच्या हालचालींवर तिसर्‍या डोळ्याची नजर
bear attacks in Japan is looking to ease laws around shooting bears
माणसांपेक्षा अस्वलेच जास्त! जपानमध्ये अस्वलांच्या हल्ल्याबाबत केले जाणारे उपाय चर्चेत का?
police, pune, drunk drivers,
पुणे : मद्यपींकडून पोलिसांच्या तिजोरीत कोट्यवधींची भर, दीड महिन्यात १६८४ जणांवर कारवाई; १२ कोटींचा दंड वसूल
Elephant Viral Video
जंगलात कार पाहताच हत्ती भडकला, रागात हल्ला करण्यासाठी गजराज पुढे येताच लोकांच्या किंकाळ्या अन् पुढे घडलं असं की…
loksatta analysis lack of banks in rural areas hit development in some districts
विश्लेषण : ग्रामीण भागांतील बँकांच्या कमतरतेमुळे असमतोल का वाढतो?
mumbai reports 3 thousand dog bite incidents in three years
श्वान दंशाच्या घटनांमध्ये वाढ; मुंबईत तीन वर्षांत ३ हजार श्वान चाव्याच्या घटना

हेही वाचा… कल्याण येथील ज्येष्ठ पत्रकार दामुभाई ठक्कर यांचे निधन

घाऊक बाजारात प्रति किलो मागे पाच ते दहा रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. घाऊक बाजारात दोन दिवसांपूर्वी ११ रुपये प्रति किलोने विक्री करण्यात येणारा दुधी भोपळा १७ रुपये प्रति किलोने विक्री केला जात आहे. ३२ रुपये प्रति किलोने विक्री करण्यात येणारी फरसबी ३५ रुपये प्रति किलोने विक्री केली जात आहे. दोन दिवसापूर्वी कारले १८ रुपये प्रति किलो दराने विक्री करण्यात येत होते. यात, ७ रुपयांची वाढ झाली असून सध्या २५ रुपये प्रति किलोने कारले विक्री करण्यात येत आहे. २० रुपये प्रति किलोने विक्री करण्यात येणारी काकडी मध्ये ही प्रति किलो मागे सात रुपयांची वाढ झाली असून सध्या २७ रुपये किलोने काकडीची विक्री करण्यात येत आहे. तर, किरकोळ बाजारात ग्राहकांकडून अव्वाचे सव्वा दर आकारुन ग्राहकांची लुट केली जात आहे.

टोमॅटो आणि कांदा सत्तरी पार

वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत १० टक्के नविन कांद्याची आवक झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. सध्या घाऊक बाजारात ४६ रुपये प्रति किलोने कांदा विक्री करण्यात येत आहे. घाऊक बाजारात कांद्याचे दर कमी झाले असले तरी किरकोळ बाजारात अद्यापही कांद्याची विक्री ७० रुपये प्रति किलोने करण्यात येत आहे, अशी माहिती वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा – बटाटा मार्केटचे सहाय्यक सचिव बाळासाहेब टावरे यांनी दिली. टोमॅटोची घाऊक बाजारात प्रतिकिलो ३८ रुपयांनी विक्रि होत आहे तर, किरकोळ बाजारात मात्र प्रति किलो ७० रुपयांनी विक्री करण्यात येत आहे. दोन दिवसांपुर्वी ५० रुपयांनी टोमॅटोची विक्रि होत होती. यामुळे टोमॅटो आणि कांदा सत्तरी पार गेले आहेत.

सध्या भाज्यांचे दर (प्रति किलो रुपयांमध्ये)

भाजीघाऊककिरकोळ
दुधी भोपळा१७४०
चवळी शेंग२७६४
फरसबी३५६०
फ्लॅावर१६६०
घेवडा३३६०
कारले२५४०
कोबी१५३०
शिमला मिरची२६५०
पडवळ२९८०
दोडका२१८०
टोमॅटो३८७०
वांगी१२४०