छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त विधाने केली होती. या विधानानंतर महाराष्ट्रात कोश्यांरीविरोधात रोष वाढला होता. तर, कोश्यारींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त होती. अशातच आज ( १२ फेब्रुवारी ) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला आहे. यावर ‘गेले सुटलो एकदाचे, देर आये दुरुस्त आये,’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “राजभवन हे भाजपाचं कार्यालय बनलं होतं. काही झालं तरी राजभवनात जायचं, तिथून चौकशी लावल्या जात. सत्ता ज्यांच्याकडे असते, ते पाहिजे तसा वापर करुन घेतात. ही काहींची मानसिकता असते. काँग्रेसच्या काळात राज्यपालांना स्वातंत्र्य होतं. मात्र, आताच्या काळात नाही.”

What Jitendra Awhad Said About Ajit Pawar?
जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर जहरी टीका, “राष्ट्रवादीतून फुटून गेलेले पाकिटमार आणि दरोडेखोर, कारण..”
What Uddhav Thackeray Said About Loksabha Election ?
उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास! “आम्ही महाराष्ट्रात ४८ जागा जिंकू भाजपाची ४५ + ची संख्या…”
uddhav thackeray and kangana
“भाजपाई कंगनाने तिचे अगाध ज्ञान पाजळून इतिहासाची…”, ठाकरे गटाचा टोला
Sanjay Raut Eknath Shinde Devendra Fadnavis
“गुलामांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात, आम्ही..”; संजय राऊत यांची महायुतीवर टीका

हेही वाचा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा मंजुरीवर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“कोश्यारी गेले, सुटलो एकदाचे… पण देर आये दुरुस्त आये… कोश्यारी हे माफी मागणाऱ्यांमधील नव्हते. कोश्यारी म्हणाले की महाराष्ट्राचं बुद्धिजिवी लोकांनी नुकसान केलं. त्यामुळे कोश्यारींच्या मनात काय होतं, याचा राज्याने विचार करावा. महाराष्ट्रातील लोकांनी गुराढोरासारखं वागलं पाहिजे. तसेच, एकाच विचारांच्या मागे लोकं गेली पाहिजे, असं त्यांच्या मनात होते. आता नवीन राज्यपाल काय प्रताप करतील, ते पाहूया,” असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे.