मुंबई आणि परिसराला शुक्रवारी संध्याकाळी पावसाने झोडपले असताना पालघरमध्ये वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला. या घटनेत १४ जण जखमी झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर येथे शुक्रवारी संध्याकाळी पावसाने हजेरी लावली. ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. काही तासांनी पावसाचा जोर ओसरला. मात्र पालघरमध्ये वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला. या घटनेत काही जनावरंही जखमी झाली. वादळी पावसात अनेक घरांवरचे पत्रे उडाले. पावसामुळे भातशेतीचेही नुकसान झाले आहे.

दरम्यान, मुंबईजवळील जवाहर द्वीपावर शुक्रवारी संध्याकाळी साडे चारच्या सुमारास तेलाचा साठा करणाऱ्या टाकीला आग लागली. जवाहर द्वीपावर ही घटना घडली. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra 5 killed lightning in palghar several injured
First published on: 06-10-2017 at 22:27 IST