राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हे गेल्या काही दिवसांपासून ठाणे महानगर पालिकेतील अधिकारी महेश अहिर यांच्यावरील आरोपप्रकरणी चर्चेत आहेत. जितेंद्र आव्हाडांनी यासंदर्भात नुकत्याच संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही आवाज उठवला होता. त्यावर महेश अहिर यांच्याकडील पदभार काढून घेत असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांत राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्याप्रकरणीही आव्हाडांनी आक्रमक भूमिका मांडली होती. सरकारविरोधात विविध मुद्द्यांवर आक्रमक होणाऱ्या जितेंद्र आव्हाडांनी ठाण्यातील एका घटनेचा व्हिडीओ ट्वीट करून राज्य सरकारवर टीकास्र सोडलं आहे.

काय आहे या व्हिडीओमध्ये?

जितेंद्र आव्हाडांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये काही व्यक्ती एका खुर्चीवर बसलेल्या मध्यमवयीन व्यक्तीला मारहाण करत असल्याचं दिसत आहे. तसेच, या व्यक्तीला सातत्याने सोशल मीडियावरची एक पोस्ट डिलीट करून माफी मागण्यासही सांगत आहेत. “आमच्या साहेबांबद्दल तू का बोलतोस?” असा प्रश्नही मारहाण करणाऱ्या व्यक्ती विचारताना व्हिडीओत दिसत आहेत. अखेर या व्यक्तीने त्यांच्यासमोर सोशल मीडियावरची पोस्ट डिलीट करून “शिंदे साहेबांची जाहीर माफी मागतो”, असं म्हटल्यानंतरच त्याची मारहाण करणाऱ्यांच्या तावडीतून सुटका झाली.

ajit pawar sharad pawar (3)
“…तेव्हा शरद पवार म्हणालेले अजितला राजकारण करू द्या, मी शेती करतो”, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला १९८९ मधला प्रसंग
different move in alliance has increased uneasiness in the Shinde Sena
मित्रपक्षाच्या ‘रसदी’मुळे शिंदे सेनेत अस्वस्थता
eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
Gujarat Congress chief Arjun Modhwadia joins BJP and attacks on congress leader
“पक्ष चालवणं म्हणजे अर्धवेळ नोकरी नव्हे”; गुजरात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी पक्ष सोडताना दिल्या कानपिचक्या!

मारहाण करणारे शिंदे गटाचे पदाधिकारी?

दरम्यान, जितेंद्र आव्हाडांनी ट्वीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, मारहाण करणारे शिंदे गटाचे ठाण्यातील पदाधिकारी होते. तसेच, ज्या व्यक्तीला मारहाण होत होती, ती व्यक्ती ठाण्यातील काँग्रेसची पदाधिकारी आहे. या प्रकरणावरून इतर पक्षीय नेत्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांविरोधातही हाच न्याय का लावला जात नाही? असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

आव्हाडांनी या ट्वीटमध्ये एकनाथ शिंदे सरकारवर टीका केली आहे. “महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणारा ठाणे काँग्रेसचा प्रवक्ता गिरीश कोळी याला शिवसेना कोपरी उपविभाग प्रमुख बंटी बाडकर व त्यांचे सहकारी शिवसैनिक यांनी चोप दिला. तसेच, ती आक्षेपार्ह पोस्ट डिलीट करण्यात आली व माफी मागण्यात आली. हे इतर कुठल्या पक्षाच्या नेत्यासाठी कार्यकर्त्यांनी केलं, तर ते गुंड. मग पोलीस छळणार. स्वत: मुख्यमंत्री त्यात हस्तक्षेप करणार. जेलमध्ये सडवणार”, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाडांनी आक्षेप नोंदवला आहे.

“मी सगळं तीन वर्षांपासून अनुभवतोय”

दरम्यान, या ट्वीटमध्ये जितेंद्र आव्हाडांनी या प्रकारावरून सूचक शब्दांत सरकारला लक्ष्यही केलं आहे. “हे सगलं मी गेले तीन वर्षं अनुभवतो आहे. गेले ३५ दिवस तर सगळ्या मर्यादा पार”, असं आव्हाडांनी म्हटलं आहे.