ठाणे : बोलण्यात गुंतवून अंगावरील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या दोन भामट्यांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या उल्हासनगर युनीटने अटक केली असून त्यांच्याकडून ठाणे आणि मुंबई परिसरातील एकूण १६ गुन्हे उघडकीस आले आहेत. अशा स्वरुपाच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात दोघांना यापुर्वी सुद्धा अटक झाली होती आणि तीन महिन्यांपुर्वी कारागृहातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी पुन्हा असे गुन्हे करण्यास सुरूवात केली होती, अशी माहिती तपासात पुढे आली आहे.

अनिल कृष्णा शेट्टी (४३) आणि रमेश विजयकुमार जयस्वाल (४७) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघे अंबरनाथ तालुक्यातील भालगाव परिसरात राहतात. ठाणे ते बदलापूरपर्यंतच्या शहरातील बाजारपेठ, सार्वजनिक रस्ता अशा ठिकाणी नागरिकांना बोलण्यात गुंतवून भामटे त्यांच्याकडील दागिने लंपास करीत असल्याच्या घटना वाढू लागल्या होत्या. याप्रकरणी नौपाडा, उल्हासनगर, बदलापुर पुर्व, शिवाजीनगर, अंबरनाथ, विठ्ठलवाडी, महात्मा फुले चौक, डोंबिवली तसेच जिल्ह्यातील इतर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

Amravati news Article on Farmers Crop Insurance
शेतकरी आहात?… पीकविमा काढायचा विचार करताय?…मग ‘हे’ वाचाच…
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Kalyan, Khadakpada Police Station, School Security, CCTV Installation, Student Safety,
कल्याणमधील शाळांना सीसीटीव्ही बसविण्याच्या पोलिसांच्या सूचना
police Nagpur dance, police dance suspended nagpur,
VIDEO : ‘खैके पान बनारस वाला’ गाण्यावर डान्स अन् निलंबनाची कुऱ्हाड; नागपुरातील ते चार पोलीस…
Crores arrears of increased compensation of farmers
शेतकऱ्यांच्या वाढीव मोबदल्याची कोट्यवधींची थकबाकी, शासनाचे वाटपाचे आश्वासन कागदावरच
Crimes against nailing trees notice to 40 people by Navi Mumbai Municipal Corporation
झाडांवर खिळे ठोकणाऱ्यांवर गुन्हे, नवी मुंबई महापालिकेची ४० जणांना नोटीस
cm eknath shinde meeting with employee unions of bandra government colony over rehabilitation
वांद्रे शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांचे अन्यत्र पुनर्वसन; भूखंडासाठी अर्ज करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना
Transfers, police officers, Maharashtra,
राज्यातील २८ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, मुंबई पोलीस दलाला मिळाले चार नवे उपायुक्त

हेही वाचा…ठाण्यात भाजपच्या जुन्या-नव्यांमध्ये रस्सीखेच

परंतु आरोपी गुन्ह्याची आणि राहण्याची जागा सातत्याने बदलत असल्यामुळे त्यांना पकडणे शक्य होत नव्हते. या प्रकरणाचा संमातर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या उल्हासनगर युनीटचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक कोळी यांच्या पथकाने सुरू केला होता. या पथकाने तपास करून अनिल आणि रमेश या दोघांना अटक केली. या दोघांनी ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रात ११ तर, मुंबई शहरात ६ असे एकूण १६ गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे, अशी माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली. ठाणे पोलिस आयुक्तालयात केलेल्या ११ गुन्ह्यातील १७ लाख २८ हजारांचा ऐवज दोघांक़डून जप्त करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.