अंबरनाथ तालुक्यात कुशिवली धरण उभारणीच्या प्रक्रियेत बनावट दस्तऐवज सादर करून भूसंपादन मोबदला लाटण्याचे प्रकार समोर आले आहेत. याप्रकरणी मंगळवारी तिसऱ्या गुन्ह्याची नोंद झाली. या प्रकरणात तब्बल ६० लाख रूपयांचा मोबदला लाटण्यात आला आहे. याप्रकरणानंतर भूसंपादन मोबदला अपहाराची रक्कम एक कोटी २३ लाख रूपयांवर पोहोचली आहे. उपविभागीय कार्यालयाने केलेल्या तपासणीत आतापर्यंत तीन प्रकरणे उघडकीस आले असून यात आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंबरनाथ तालुक्यात नव्या जलस्त्रोतांची उभारणी करण्याच्या दृष्टीने कुशवली येथे धरणाचा प्रस्ताव मंजुर करण्यात आला. या कामासाठी ८५.४० हेक्टर क्षेत्राची आवश्यकता होती. उल्हासनगरच्या उपविभागीय कार्यालयाकडून ही प्रक्रिया गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. आतापर्यंत ५२. २४ हेक्टर क्षेत्राची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून ५३ खातेधारकांना सुमारे ११ कोटी ५१ लाख रूपयांची रक्कम मोबदला स्वरूपात अदा करण्यात आली आहे. याच प्रक्रियेत डिसेंबर महिन्यात बनावट कागदपत्रे सादर करून मोबदला लाटण्याचा प्रयत्न केल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनाल आले होते. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Third case registered against land aquisition case in ambarnath sgy
First published on: 25-05-2022 at 12:04 IST