Assam Floods Reporter Viral Video : पत्रकार होणं तितकं सोपं काम नाही. पत्रकारिता करताना अनेक धोकेही पत्करावे लागतात. लोकांच्या समस्या दाखविण्यासाठी पत्रकारांनाही स्वत:ला अनेकदा विविध समस्यांचा सामना करावा लागतो. पूर, वादळ किंवा इतर नैसर्गिक आपत्ती असो; पत्रकार प्रत्येक ठिकाणी पोहोचून तुम्हाला क्षणा-क्षणाच्या अपडेट्स देत असतो. अशाच प्रकारे एक पत्रकार एका गावातील पूरस्थितीचे वार्तांकन करत होता. त्यावेळी अचानक त्याचा पाय घसरला आणि तो थेट नदीत कोसळला. सध्या सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

वार्तांकनादरम्यान पत्रकाराबरोबर घडली अशी घटना की, पाहून व्हाल चकित

समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना आसाममध्ये घडली आहे. आसामच्या अनेक भागांत मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. त्यामुळे आसामचा जवळपास अर्ध्याहून अधिक भाग पाण्याखाली गेला आहे. रस्ते दिसेनासे झालेत, अनेक लोकांच्या घरांत पाणी शिरलेय. दरम्यान, पूरग्रस्त भागातील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एक पत्रकार तिथे गेला. यावेळी नदीच्या काठावर उभे राहून तो लोकांच्या समस्यांचे वार्तांकन करीत होता. पुरामुळे येथील रहिवाशांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतोय हे तो सांगत होता.

वार्तांकनादरम्यान पाय घसरून थेट नदीत

दरम्यान, वार्तांकन सुरू असताना पत्रकार त्याच्यामागे दिसणाऱ्या नदीच्या दिशेने मागे सरकत होता. यावेळी त्याला मागे येत असताना पायाखालच्या पाणथळ जमिनीचा नेमका अंदाज न आल्याने तो नदीत कोसळला. पोहता येत असल्याने पत्रकार कसाबसा किनाऱ्यावर आला. यावेळी स्थानिकांनी त्याता हात देऊन, नदीतून वर खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र किनाऱ्यावरील जमीन भुसभुशीत झाल्याने कोसळत होती. त्यामुळे तो पत्रकारही पुन्हा पाण्यात पडला आणि काही अंतर पुढे वाहत गेला. पण, लोकांनी त्याला मदत करीत पाण्यातून बाहेर काढले. (Reporter Falls in river while reporting)

More Stories On Monsoon Update : Viral Video : भरपावसात ट्रकचालकाची माणुसकी! रस्त्यात साठलेल्या पाण्यात अडकली तरुणी; तेवढ्यात चालक देवासारखा धावला अन्…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिळालेल्या माहितीनुसार, हा पत्रकार वार्तांकन करताना आयताप्पी नदीच्या पाण्यात पडला. चांगली गोष्ट म्हणजे त्याला पोहता येत होतो आणि नदीचा प्रवाहालाही जास्त वेग नव्हता. त्यामुळे कोणतीही गंभीर दुर्घटना घडू शकली नाही. यावरून अशा पूरग्रस्त भागात लोकांचे जगणे किती कठीण असेल याचा अंदाज येऊ शकतो. त्यामुळे लहान मुले, महिला व वृद्धांनी पावसाळ्यात नदीकिनाऱ्याच्या परिसरात जाणे टाळा; अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता असते.