रेल्वे अपघाताच्या अनेक बातम्या वारंवार समोर येऊनही प्रवासी जागरूक होत नाहीत. सोशल मीडियावरही रेल्वे अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. याबाबत भारतीय रेल्वेकडून अनेक जनजागृती मोहिमा राबवल्या जातात. तसेच सुरक्षित प्रवासासाठी रेल्वेस्थानकांवर सातत्याने मार्गदर्शक सूचनाही दिल्या जातात. तरीही काही प्रवासी जीव धोक्यात घालून प्रवास करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एका जीवघेण्या रेल्वे प्रवासाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे; जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

धावत्या रेल्वेच्या दोन डब्यांच्या जॉइंटवर बसून कधी कोणी प्रवास करू शकेल याची तुम्ही कधी कल्पना तरी करू शकता का? पण व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला अशा प्रकारे जीवघेणा प्रवास करत असल्याचे दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्या महिलेच्या हातात एक लहान मूलदेखील आहे.

ट्रेनच्या दोन डब्ब्यांच्या जॉइंटवर बसून जीवघेणा प्रवास

रेल्वेकडून वारंवार सूचना देऊनही काही प्रवासी निष्काळजीपणा करताना दिसून येतात. अशामुळेच रेल्वे अपघाताच्या घटना घडतात. आता व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला लहान मुलाला मांडीवर घेऊन ट्रेनच्या दोन डब्यांच्या जॉइंटवर बसून प्रवास करत आहे. दोन डब्यांची ही जॉइंट म्हणजे लोखंडाची एक पातळ पट्टी आहे; ज्यावर जीव मुठीत घेऊन ही महिला बसलेली आहे. महिलेने एका हातात मुलाला धरले आहे आणि दुसऱ्या हाताने ट्रेनच्या रॉडला पकडले आहे. ट्रेन सुसाट वेगात जात असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. महिलेने थोडासाही निष्काळजीपणा केला, तर ती खाली पडू शकेल, असे त्यात दिसते आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ ZahidHA68 नावाच्या ट्विट अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय की, महिलेकडे तिकीट विकत घेण्यासाठी पैसे नव्हते. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तिथे हा व्हिडीओ बनवणारी आणखी एक व्यक्ती उपस्थित होती, असा अंदाज आहे. पण, हा व्हिडीओ भारतातील नसून बांग्लादेशमधील असल्याचा दावा काही जण करत आहेत. रेल्वे अपघातातून धडा घेण्याऐवजी लोक सतत त्याच त्याच चुकांची पुनरावृत्ती करताना दिसत आहेत. अलीकडेच भारतीय रेल्वे प्रवासादरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता; ज्यात एक प्रवासी ट्रेनच्या दरवाजात लटकून प्रवास करत होता. यावेळी त्याच्या पाठीवर एक बॅग होती. ट्रेन काही अंतर गेल्यावर त्याची बॅग विजेच्या खांबाला धडकली आणि तो खाली पडला. त्यामुळे रेल्वेने प्रवास करताना प्रत्येकाने जीवाची काळजी घेतली पाहिजे. गर्दी असल्यास रेल्वेच्या दरवाजात लटकून प्रवास करणे टाळले पाहिजे.