तुम्ही कधी ‘हायकोर्ट’, ‘अँड्राईड’, ‘स्मार्टफोन’ , ‘जिओनी’, ‘ सॅमसंग’ अशी नावं माणसांना ठेवलेली ऐकलीत का? मग तर भारताच्या या गावाबद्दल तुम्हाला माहित असलंच पाहिजे हे असं गाव आहे जिथे मुलांची नावं राम, श्याम, सुरेश, रमेश वगैरे न ठेवता अशीच काहीशी विचित्र नाव ठेवली आहेत. रामनगर हे असं भारतातलं असं गाव आहेत ज्या गावात मुलांची नावं अशीच काहिशी ठेवली जातात.

जेमतेम ५०० लोकांची वस्ती असलेलं हे गाव. येथे जास्तीत जास्त कंजर जामातीची लोकं राहतात आणि गावात साक्षरतेचा दूरदूपर्यंत पत्ता नाही. एकादा प्रसिद्ध ब्रँड, मोठी संस्था किंवा मोठा हुद्दा यांच्यासाठी सर्वकाही म्हणूनच आपल्या मुलांची नावं गावकरी ‘, ‘अँड्राईड’, ‘स्मार्टफोन’ , ‘जिओनी’, ‘ सॅमसंग’ अशीच ठेवतात. हे ही काय थोडकं तर काही मुलांची नाव ‘मिस्ड् कॉल’ ‘सिम कार्ड’, ‘राज्यपाल’, ‘राष्ट्रपती’ अशीही आहेत. गावातल्या एका महिलेला कलेक्टरचा हुद्दा मोठा असल्याचे समजताच तिने आपल्या नातवाचे नाव चक्क ‘कलेक्टर’ ठेवलं हा तिचा नातू कधी शाळेत गेला नाही हि वेगळी गोष्ट.

या गावातले अनेक लोक अशिक्षित आहेत तर अनेकांना गुन्हेगारी पार्श्वभूमी देखील आहे. त्यामुळे गावक-यांची तुरुंगवारी ठरलेलीच असते. तिथे गेल्यावर पोलीस निरिक्षक, पोलीस संचालक, उपनिरिक्षक यांचा हुद्दा मोठा असल्याचे समजताच इथल्या लोकांनी आपल्या मुलांची नावं ” आयजी”, ”डीजी” अशीही ठेवायला सुरुवात केली असेही इथल्या एका शिक्षकांने पीटीआयला सांगितले. एका मुलाचा जन्म झाला तेव्हा त्याच्या आजोबांवर न्यायलयात खटला सुरू होता म्हणून त्याचे नाव ” हायकोर्ट” ठेवले. असे एक ना दोन अनेक किस्से या गावाचे प्रसिद्ध आहेत.

” गावक-यांची अशी विचित्र नाव ऐकण्याची आम्हाला सवय झालीय” असेही एका सरकारी अधिका-यांने पीटीआयला साांगितले. वरून हल्ली हल्ली या नावांमध्ये ‘, ‘अँड्राईड’, ‘स्मार्टफोन या दोन नावांची नव्याने भर पडल्याचेही त्यांनी सांगितले. तर असं आहे हे रामनगर जिथे राम नावाचा व्यक्ती कोणी नसला तरी अशा अजब गजब नावांची शेकडो माणसं तुम्हाला भेटतील. तेव्हा भविष्यात तुम्ही चुकून माकून या गावात गेलात आणि ”स्मार्टफोन मेंढर चरायला घेऊन गेलाय”, ”हायकोर्टचं लग्न झालंय”‘ ” अँड्राईडचं निधन झालाय” अशी वाक्य कानावर पडली तर आश्चर्य वाटून घेऊ नका.