Viral video: मुंबईच्या रस्त्यांवर कशा पद्धतीने खड्ड्यांचं साम्राज्य आहे याचा प्रत्यय आज गोरेगावमध्ये आलाय.मुंबईचे रस्ते आणि खड्डे हे एक वेगळंच समिकरण आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. पण या राजधानीमधील रस्ते पाहिले तर कदाचित खेडेगावातील रस्ते त्या तुलनेत चांगले आहे अस म्हणता येईल. अर्थात हे रस्ते दुरूस्त व्हावे यासाठी मुंबईकरांनी आजवर अनेकदा आवाज उठवले आहेत. अगदी मराठी सेलिब्रिटींनी सुद्धा या प्रकरणी महानगरपालिकेवर टीका केली आहे.

पण त्यानंतर तात्पुरते रस्ते दुरुस्त होतात आणि पाऊस पडताच पुन्हा खड्डे दिसू लागतात. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील गोरेगावमध्ये एक महिला भर रस्त्यात चालत असताना गटाराच्या वर लावलेल्या जाळीत पाय अडकून पडली आहे. फक्त पडली नाहीतर या लोखंडी जाळीमध्ये तिचा पाय अडकलेला आहे. यावेळी वेदनेनं ती ओरडतानाही दिसत आहे. तुटलेली अर्धवट जाळी दुरुस्त न केल्यानं हा अपघात घडला असून पालिकेचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.

यावेळी सर्व लोक रस्त्यावर जमले असून या महिलेला मदत करताना दिसत आहेत. यानंतर तेलं लावून महिलेचा पाय त्या जाळीतून अखेर काढण्यात आला. महिलेचा पाय थोडक्यात बचावला असला तरीही पायाला गंभीर दुखापत झाल्याचं दिसत आहे. आज ही महिला थोडक्यात बचावली असली तरी याची दुरुस्ती तातडीने केली नाहीतर पुन्हा याठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ pinks_mcwen19 या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी मुंबईच्या रस्तावर टीका केली आहे. यापूर्वी देखील अनेकदा असे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ज्यामुळे रस्त्यांची दुरावस्था दाखवण्यात आली. एकानं पालिकेवर टीका करत, “सरकारच्या मते, जनता जबाबदार आहे. जगातील सर्वात श्रीमंत नगरपालिकेने अविचारीपणे बांधलेली सर्वात वाईट पायाभूत सुविधा, पण शून्य जबाबदारी आणि फक्त भ्रष्टाचार.” असं म्हंटलं आहे.