वसई : श्रीराम मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शहरात तणावपूर्ण शांतता आहे. मंगळवारी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यात स्थानिक पोलिसांबरोबर राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रण पथकाच्या तुकड्यांचा समावेश आहे. नया नगरला जाणारे रस्ते बंद करण्यात आले असून पोलिसांनी शहरात संचलन केले.
हेही वाचा : वसई : रूळ दुरुस्तीचे काम करताना लोकलची ठोकर लागून तीन रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि संयम बाळगावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या घटनेच्या निमित्ताने भाजप आमदार नितेश राणे यांनी चिथावणी देणारे ट्विट केले होते. मंगळवारी ते मीरा रोडमध्ये येत आहेत. वातावरण चिघळू नये यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन नियोजन केले आहे.