वसई: वसई ते नायगाव या दरम्यान रेल्वे रूळ दुरुस्तीचे काम करताना लोकलची धडक लागून तीन रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. वसई ते नायगाव या दरम्यान रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मार्फत रेल्वे रूळ दुरुस्तीचे काम सुरू होते. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास रुळावर लोकल आली.

हेही वाचा : भाईंदर : मीरा रोडमध्ये मिरवणूकीवर दगडफेक, वाहनांची तोडफोड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकल आल्यानंतर नेमकी गाडी कोणत्या रुळावर येईल असा गोंधळ कर्मचाऱ्यांचा झाला. याच वेळी गाडीची धडक लागून तीन रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. वासू मित्र (५६), सोमनाथ उत्तम लाबुतरे (३७), सचिन वानखेडे (३७) अशी मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या प्रकरणी वसई रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सचिन इंगवले यांनी दिली आहे.