वसई : नालासोपारा शहरात बेकायदेशीरपणे वाहतूक करणार्‍या मॅजिक वाहन आणि रिक्षाचालकांचा वाद सोमवारी पुन्हा पेटला. रिक्षाचालकांनी मॅजिक वाहनचालकांना मारहाण केल्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. यामुळे संतप्त रिक्षाचालकांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घालून नंतर दोन तास काम बंद आंदोलन केले. या आंदोलनाचा फटका प्रवाशांना बसला

वसई विरार शहराच्या वाढत्या नागरिकरणा पाठोपाठ रिक्षांची संख्या ही बेसुमार वाढली आहे. त्यातच काही कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना बेकायदेशीरपणे रिक्षा चालवत आहेर. तर दुसरीकडे मॅजिकमधून प्रवासी वाहतुकीला बंदी असतानाही ते ही सर्रास पणे प्रवासी भरून वाहतूक करतात. मॅजिक वाहनांमुळे धंद्यावर परिणाम होत असल्याचा रिक्षाचालकांचा आरोप आहे. त्यामुळे मॅजिक वाहनचालक आणि रिक्षाचालक यांच्यात वाद होत असतात. मॅजिक वाहनचालकांवर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ रिक्षा चालकांच्या संघटनांनी शनिवारी नालासोपाऱ्यात रिक्षा बंद आंदोलन केले होते. यात संतोष भवन, धानिवबाग, बिलालपाडा, नालासोपारा फाटा येथील रिक्षा संघटना सहभागी झाल्या होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोमवारी हा वाद अधिक चिघळला. नालासोपार्‍यातील रिक्षाचालकांनी एका मॅजिक वाहनचालकाला मारहाण केली. यामुळे तुळींज पोलिसांनी मारहाण करणार्‍या रिक्षाचालकांविरोधात गुन्हे दाखल केले. या कारवाईच्या निषेधार्थ रिक्षाचालकांनी सोमवारी दुपारी तुळींज पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. पोलिसांनी रिक्षाचालकांची तक्रार न घेतल्याने रिक्षाचालकांना अचाकन रिक्षा बंद करून आंदोलन पुकारले. सुमारे दिडेशहून अधिक रिक्षाचालक या अघोषित संपात सहभागी झाले होते. दोन तास हे आंदोलन सुरू होते. सुरवातीला पोलिसांना या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले होते. मात्र रिक्षा बंद झाल्याने रेल्वे स्थानकाहून घरी परतणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून रिक्षाचालकांना पांगवले आणि नंतर रिक्षा पूर्ववत सुूरू झाल्या.