पुण्यानंतर पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या लोणावळा शहरात रानगवा दाखल झाला होता. त्याला राजमाची किल्ला परिसरातील जंगलात सुखरूप सोडण्यात मावळ वनविभागाला तसंच शिव दुर्ग रेस्क्यू पथकाला यश आलं आहे. अनेकदा अन्नाच्या शोधत हे प्राणी शहरात दाखल होतात. पुण्यात अशाच एका गव्याचा रेस्क्यूदरम्यान मृत्यू झाला होता. लोणावळ्यात मात्र विशेष काळजी घेऊन त्याला न घाबरवता जंगलात सोडण्यात आलं.