पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेतला भाषणात काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला आहे. “आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळूनही देशात गुलामगिरीची मानसिकता कुणी वाढवली? जर तुम्ही इंग्रजांपासून प्रभावित नव्हता तर दंड संहिता जी इंग्रजांनी तयार केली होती ती बदलली का नाही? इंग्रजांच्या काळातले शेकडो कायदे का बदलले नाही? लालबत्ती संस्कृती किती दशकं देशात सुरु होता?” असे ही प्रश्नही मोदी यांनी विचारले.